एक्स्प्लोर

पुढच्या वर्षीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र?

काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

नवी दिल्ली : जास्तीत जास्त राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते, असं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी मागणी अनेकदा केली जाते. सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यांच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा बोलून दाखवलं आहे. त्यामुळे ही कल्पना आता प्रत्यक्षात येऊ शकते. कारण येत्या काळात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यासोबत लोकसभा निवडणूक घेण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो. या प्रक्रियेबाबत सध्या लोकसभेचे माजी महासचिव सुभाष सी. कश्यप आणि इतर सचिवांचं मत जाणून घेतलं जात आहे. सध्याच्या तरतुदीनुसार सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर सहा महिने निवडणूक घेतली जाऊ शकते. यासाठी कायद्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यात येणाऱ्या राज्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतात. सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने अगोदर निवडणूक घेता येते, अशी तरतूद संविधानात आहे. याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत आणि कायद्यात कोणतीही दुरुस्ती करण्याची गरज नाही, असं सुभाष कश्यप यांनी सांगितलं. निवडणुका एकत्र घेण्यासाठी राजकीय पक्षांचं समर्थन मिळवणं केंद्र सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान असेल. आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल 2019 मध्ये होणार आहे. ही निवडणूक मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांसोबत घेतली जाऊ शकते. यामध्ये मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये संपणार आहे. राजकीय पक्षांची सहमती असेल, तर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांची निवडणूकही या राज्यांसोबतच घेतली जाऊ शकते. कारण आंध्र प्रदेश, तेंलगणा आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळही एप्रिल 2019 पर्यंत आहे. ओदिशामध्ये लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक बीजेडीसाठी फायदेशीर ठरलेली आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये 2014 साली लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक झाली. यामध्ये मोदी लाटेचा फायदा टीडीपीला झाला. दुसरीकडे तेलंगणामध्ये टीआरएसने सहमती दर्शवल्यास वेळेपूर्वी निवडणूक घेणं शक्य होईल. मोदींनी अनेकदा निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना बोलून दाखवली आहे. विरोधी पक्ष आणि भाजपनेही एकत्र निवडणुकांसाठी त्याग करण्याची गरज आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. एकाचवेळी सर्व राज्यांच्या निवडणुका घेणं सध्या तरी शक्य नाही. कारण राज्य सरकारला त्यांचा उर्वरित कार्यकाळ सोडून नव्याने निवडणुका लढायला तयार करणं शक्य होणार नाही. जर काही राज्यांमध्ये एका वर्षाच्या अंतराने निवडणुका होणार असतील, राज्य आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाची सत्ता असेल, तर विधानसभा बरखास्त करुन नव्याने निवडणूक घेता येईल. आगामी लोकसभा निवडणुकीपासून ही प्रक्रिया सुरु केली तर येत्या दहा वर्षात जास्तीत जास्त राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत होतील, असं सुभाष कश्यप म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget