एक्स्प्लोर
रिपोर्ट कार्ड : निराशाजनक कामगिरी असणारे मोदी सरकारमधील पाच मंत्री

नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या तीन वर्षात सरकारने अनेक कामं केली, अनेक आश्वासनं दिली, तर अनेक प्रश्नांवरुन सरकारला जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागला. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तीन वर्षात कशा प्रकारे काम केलं, याची पडताळणी 'एबीपी न्यूज'च्या तज्ज्ञांनी केली आहे. एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील 24 मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाच्या आधारे 50 तज्ञांच्या टीमने गुण दिले. या टीममध्ये देशभरातील नामांकित 50 पत्रकारांचा समावेश होता. मंत्र्यांना दहापैकी गुण देण्यात आले. ज्यांना पाचपेक्षा कमी गुण मिळाले, त्यांना खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.
- हरसिमरत कौर, अन्न प्रक्रिया मंत्री
- उमा भारती, जलसंधारण मंत्री
- महेश शर्मा, पर्यटन मंत्री
- राजीव प्रताप रुडी, कौशल्य विकास मंत्री
- मुख्तार अब्बास नकवी, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















