एक्स्प्लोर

Kerala Boat Tragedy : केरळमध्ये प्रवासी बोट उलटली, 21 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

Kerala Boat Tragedy : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला.

Kerala Boat Tragedy : केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे.

बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती.

क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा बोटीतून प्रवास

ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक 

या अपघातानंतर राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार मिळावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तिरुर, थिरुंगडी, पेरिंथलमन्ना रुग्णालये आणि मंचेरी वैद्यकीय महाविद्यालयात थ्रिसूर आणि कोझिकोड सारख्या जिल्ह्यातील डॉक्टरांसह पुरेसे कर्मचारी आणून शवविच्छेदन केलं जाईल. मंत्र्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि शक्य असल्यास ते खाजगी रुग्णालयातही करावेत, असं निर्देशांमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. यासोबतच त्यांनी ट्वीट करुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची भरपाईल दिली जाईल.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 04 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सSugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special ReportABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 04 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
Embed widget