एक्स्प्लोर

Jammu Kashmir News: 15 जूनला घरी यायचं होतं पण नियतीने सर्वच हिरावलं, लेकाच्या पहिल्या वाढदिवसाआधीच वडिलांवर काळाचा घाला; महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी दुःखद बातमी समोर आली आहे.

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील उरी सेक्टरमधून (Uri Sector) महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आणि दुःखद बातमी समोर आली आहे. उरीमधील एका लष्करी तळावर (Military Base) झालेल्या दुर्दैवी हँड ग्रेनेड स्फोटात (Hand Grenade Blast) महाराष्ट्राच्या दोन धाडसी जवानांना वीरमरण (Martyrdom) आले आहे. अर्जुन जाधव आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण अशी या शहीद वीरांची नावे असून, ते दोघेही '8 राष्ट्रीय रायफल्स'मध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

Jammu Kashmir News: नियमित शस्त्रास्त्र हाताळणी दरम्यान भीषण अपघात

शहीद अर्जुन जाधव हे साताऱ्याचे, तर विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी होते. ही हृदयद्रावक घटना उरीतील कमलकोट येथील एका लष्करी छावणीत सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. लष्कराच्या छावणीत शस्त्रास्त्रे हस्तांतरित करण्याची आणि ती तपासण्याची नियमित प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान अचानक एका हँड ग्रेनेडचा चुकून भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवान अर्जुन जाधव आणि विक्रम चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर लष्कराने तातडीने सूत्रे हलवून दोन्ही जखमी जवानांना हवाई दलाच्या विमानाने श्रीनगरच्या बदामीबाग कॅन्टोन्मेंटमधील लष्करी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. हा स्फोट नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारणांमुळे, याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजेच कायदेशीर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Jammu Kashmir News: लेकाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा राहून गेला

या संपूर्ण घटनेत साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र अर्जुन जाधव यांची कहाणी ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन हे लष्कराच्या 'बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप'चे जवान होते. त्यांच्या डोक्यात सध्या एकच विचार घोळत होता, तो म्हणजे आपल्या पोटच्या लाडक्या लेकाचा पहिला वाढदिवस. येत्या 25 जून रोजी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. एकुलत्या एका मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी त्यांनी मनात अनेक स्वप्ने आखली होती आणि त्याची तयारीही सुरू केली होती.

या आनंदाच्या सोहळ्यासाठी ते येत्या 15 जूनपासून सुट्टी घेऊन गावाकडे येणार होते. कधी 15 जून उजाडतो आणि आपण घरी जातो, असं त्यांना झालं होतं. घरातही आनंदाचे वातावरण होते; आई-वडील आणि पत्नी लाडक्या लेकाच्या वाढदिवसाची आणि अर्जुन यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, घरी येण्यापूर्वी अवघे 10 दिवस आधीच नियतीने घात केला. ज्या लेकासाठी बाप घरी जाण्याची खटपट करत होता, तो देशाचे रक्षण करताना रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याची ही इच्छा अपुरीच राहिली.

Jammu Kashmir News: नवी मुंबईच्या 'डॅशिंग' जवानाचे वीरमरण 

याच भीषण अपघातात नवी मुंबईतील ऐरोलीचे रहिवासी असलेले जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनीही देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. विक्रम हे अत्यंत हुशार आणि डॅशिंग जवान म्हणून ओळखले जात होते. एका कर्तव्यदक्ष तरुण जवानाला गमावल्यामुळे ऐरोली परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात प्रचंड शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या पुत्राच्या जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, या दुःखातून सावरणं त्यांना कठीण झालं आहे. लष्करी इतमामात या दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

NCP Sharad Pawar on Pune Rave Party: शिवराज्याभिषेक दिनी पुण्यात पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्पादन शुल्क सचिवांना विचारला जाब

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget