एक्स्प्लोर

भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक, जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं : संजय राऊत

मौन धारण केल्याच्या चर्चांनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत एक्स्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (29 मार्च) केलेल्या एका ट्वीटमुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं..., असं ट्वीट करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या. त्यावर भाजप नेत्यांचा भ्रमनिरास झाला असेल. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. मौन धारण केल्याच्या चर्चांनंतर संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'सोबत एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत शिवसेनेचा आवाज कोणीच बंद करु शकत नाही : संजय राऊत
"भाजपचे लोक ध चा मा करण्यात पटाईत आहेत. मी काल काही विषयावर बोलणं टाळलं. एखाद्या विषयावर रोज बोललंच पाहिजे असं नाही. पक्षाची भूमिका असेल तेव्हाच आम्ही बोलतो. भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे. त्यामुळे काल त्यांनी बरेच पतंग उडवले. पण संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली माणसं आहोत." 

तपास गुप्त पद्धतीने सुरु आहे : संजय राऊत
किरीट सोमय्या, नील सोमय्या तसंच नारायण राणे यांच्याबद्दल महाविकास आघाडीने नरमाईची भूमिका घेतली आहे का असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी असतात. मुंबई पोलीस किंवा कोणतीही तपास यंत्रणा आम्ही तपास करणार नाही, असं सांगणार नाही. यावेळी तपास गुप्त पद्धतीने सुरु आहे, कारण गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. कोर्टात काही सांगितलं म्हणून भविष्यात काही नसेल असं नाही. 

शिवसेना ही वाघाची गर्जना आहे आणि वाघ कधी मौनात जात नाही. आम्ही कमी बोलल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी किंवा राजकीय विरोधकांनी आनंद साजरा केला असेल. मी त्यांच्या आनंदात मीठाचा खडा टाकला नाही. राजकारणातील विरोध हा तात्विक असतो. भाजपचे लोक ज्या पद्धतीने द्वेषाने, सुडाने आणि बदल्याच्या भावनेने वागतात तसं शिवसेना कधी वागत नाही, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

'...तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल'
शिवसेनेचे काही नेत्यांनी राष्ट्रवादीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज आमचे काही खासदार बोलत आहेत,  भाजपसोबत आमचं सरकार असतानाही त्यांची हीच खंत होती. ही भूमिका बदलायची असेल तर शिवसेनेला स्वबळावर राज्य आणावं लागेल. आता आमचे जे नेते बोलत आहेत त्यांनी स्वबळाची तयारी ठेवली पाहिजे. कोणतंही आघाडीचं सरकार असलं तरी अशाप्रकारच्या ठिणग्या उडत राहतात. आज जे राष्ट्रवादीवर राग व्यक्त करत आहेत, त्यांचा काल भाजपवर ही राग होता आणि त्या रागातूनच हे सरकार स्थापन झाला आहे.

वरुण गांधींसोबतच्या भेटीबाबत राऊत काय म्हणाले?
भाजप खासदार वरुण गांधी यांनी काल संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये तीन तास चर्चा झाली. या भेटीविषयी राऊत म्हणाले की, "गांधी कुटुंबासोबतचे माझे संबंध पूर्वीपासूनच जिव्हाळ्याचे आहेत. या देशातील राजकारणातील ते महत्त्वाचं कुटुंब आहे. देशासाठी त्याग केलेल्या कुटुंबापैकी ते कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवणं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही राज्यात काँग्रेससोबत सत्तेत आहोत." वरुण गांधी यांचा वेगळा विचार सुरु आहे का आणि शिवसेना तो पर्याय आहे का, यावर संजय राऊत म्हणाले की, "आम्ही त्यावर चर्चा केली नाही. दोघेही विचारांची आदानप्रदान करतो. ते हिंदुत्त्ववादी आहेत. त्यांना शिवसेनेच्या प्रखर हिंदुत्त्ववादाचं आकर्षण आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी त्यांना ममत्व आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे ते सच्चे भक्त राहिलेले आहेत."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास करवाई होणार 
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास करवाई होणार 
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO
गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा
गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा
Raj Thackeray & Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे शिवतीर्थवरुन बाहेर पडताच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार
उद्धव ठाकरे शिवतीर्थवरुन बाहेर पडताच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास करवाई होणार 
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, अटी शर्तींचं उल्लंघन केल्यास करवाई होणार 
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO
उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसही राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर, गणरायाचे दर्शनाचे PHOTO
गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा
गुजरातमधील 10 बेनामी पक्षांना मागील पाच वर्षात 4300 कोटींची देणगी, खर्च दाखवला 39 लाख; निवडणूक आयोग त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागणार का? राहुल यांची विचारणा
Raj Thackeray & Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे शिवतीर्थवरुन बाहेर पडताच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार
उद्धव ठाकरे शिवतीर्थवरुन बाहेर पडताच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गणपती दर्शनाला जाणार
Eknath Shinde : मनोज जरांगे मुंबईकडे निघताच हालचालींना वेग, एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा रद्द, संघर्षयोद्ध्याशी सरकार पुन्हा चर्चा करणार
मनोज जरांगे मुंबईकडे निघताच हालचालींना वेग, एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा रद्द, संघर्षयोद्ध्याशी सरकार पुन्हा चर्चा करणार
Rule Change : चांदी खरेदी, ATM, मुदत ठेव ते क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, 1 सप्टेंबरपासून नवे बदल लागू 
चांदी खरेदी, ATM, मुदत ठेव ते क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, 1 सप्टेंबरपासून नवे बदल लागू 
Chitra Wagh : गबाळं नाहीतर काय उचकायचंय ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही; चित्रा वाघ यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
गबाळं नाहीतर काय उचकायचंय ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही; चित्रा वाघ यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
70 मिनिटांनंतर सिनेमाची स्टोरी एकदम पलटते, चक्रावून टाकणारा थ्रिलर सिनेमा, भारतात नंबर 1 वर ट्रेंड करतोय सिनेमा
70 मिनिटांनंतर सिनेमाची स्टोरी एकदम पलटते, चक्रावून टाकणारा थ्रिलर सिनेमा, भारतात नंबर 1 वर ट्रेंड करतोय सिनेमा
Embed widget