एक्स्प्लोर

India Pakistan War: मोठी बातमी : भारताने गिअर बदलला, आता मिशन DEAD सुरु, पाकिस्तान म्हणतं, आता आम्हाला शांती हवी!

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला तोंड फुटले आहे. भारतीय सैन्याचा पवित्रा टप्प्याटप्प्याने आक्रमक होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या मंत्र्याचा पवित्रा बदलला

India Pakistan War: भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची रणनीती न अवलंबता नुकसान होईल, असे मोठे प्रतिहल्ले करण्यास सुरुवात झली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नरमताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आम्हाला युद्ध नको  शांती हवी, असे वक्तव्य इशाक दार (Ishaq Dar) यांनी केले आहे. 

जर भारताने हल्ले थांबवले तर आम्हीही थांबू. आम्हाला विनाश नको, आम्हाला निधीचा अपव्यय नको. जर त्यांनी थांबवले तर आम्हीही थांबू.पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी होती. जर भारताने या क्षणी थांबले तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि बदला घेणार नाही किंवा काहीही करणार नाही.आम्हाला खरोखर शांतता हवी आहे, असे इशाक दार यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इशाक दार यांनी भारताविरोध वक्तव्य करुन वातावरण तापवले होते. मात्र, आता त्यांच इशाक दार यांनी, 'आम्हाला आता लढायचं नाही, भारत थांबला तर आम्ही थांबू', अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Indian Army: भारताने कारवाईचा गिअर बदलला

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या चार दिवसांपासून हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तोफांनी, क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मारा केला जात आहे. भारताने सर्वप्रथम ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता भारत टप्प्याटप्प्याने ही मोहीम पुढे नेत आहे. दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला सैन्याने तेव्हा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रं नष्ट करुन भारताने या हल्ल्याला सरप्रेस केले. त्यानंतरही शु्क्रवारीही पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्याने फक्त 'सप्रेशन' स्ट्रॅटेजी न वापरता काऊंटर अटॅक केला. भारतीय सैन्याचे पहिले धोरण (सप्रेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स) म्हणजे सीड असे होते. आता भारताने डिस्ट्रक्शन ऑफ एनिमी एअर डिफेन्स (DEAD)  धोरण वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या कालच्या हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करुन पाकिस्तानी सैन्याचे हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. 

पाकिस्तानने भारतावर पहिला हल्ला तेव्हा फक्त रक्षण करण्याचा पवित्रा होता. दुसऱ्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर आता पाकिस्तानने पुन्हा हल्लास केल्यास ऑपरेशन सिंदूर 3 अंतर्गत आणखी मोठा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

आणखी वाचा

पाकिस्तानात अणवस्त्रांबाबत निर्णय घेणाऱ्या सर्वोच्च समितीची बैठक खरोखरच झाली का? संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं स्पष्टीकरण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
Embed widget