एक्स्प्लोर

India vs Pakistan War: पाकिस्तान चहू बाजूंनी वेढला, भारतासोबत नडत राहिला अन् देशाचा एक तृतीयांश भाग गमावला; बलोच आर्मीने झेंडा फडकवला!

India vs Pakistan War: भारताशी वाकड्यात जाऊन, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे.

India vs Pakistan War: भारताशी वाकड्यात जाऊन, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. एकीकडे भारत पाकिस्तानात (India vs Pakistan War) घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरलं आहे. बलोच आर्मीने (Balochistan) जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. कालच सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून, पाकिस्तानच्या 14 सैनिकांना यमसदनी पाठवल्याचं समोर आलं होतं. याआधी याचवर्षी मार्च महिन्यात याच बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचं अपहरण करून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते.

बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केले-

बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावरीलही नियंत्रण पाकिस्तानने गमावल्याची माहिती आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करत बीएलएने क्वेटा ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केलेत.  पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

बलुचिस्तानमध्ये 1948 पासून स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू-

बलुचिस्तानचा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये महत्त्वाचा स्थान आहे. तथापि, येथील अस्थिरता आणि विकासाच्या अभावामुळे प्रांताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बलुचिस्तानमध्ये 1948 पासून स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू आहेत. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सारख्या संघटना पाकिस्तान सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करतात. या संघटनांचे आरोप आहेत की, पाकिस्तान सरकार प्रांताच्या नैसर्गिक संसाधनांचा शोषण करते आणि स्थानिक लोकांना त्यांच्या विकासात सहभागी करत नाही. या संघर्षामुळे प्रांतात अनेक वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यात सुरक्षा दलांवर हल्ले, अपहरण आणि बॉम्बस्फोट यांचा समावेश आहे.

बलुचिस्तान पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतो-

बलुचिस्तान (Balochistan) हे पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील सर्वात मोठे, पण तुलनेने कमी लोकसंख्या असलेले प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ सुमारे 347,190 चौ.किमी असून, ते पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे 44% आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सारख्या गटांनी पाकिस्तानपासून स्वतंत्रतेसाठी सशस्त्र संघर्ष सुरू केला आहे. या संघर्षात अनेकदा सुरक्षा दलांवर आणि परदेशी नागरिकांवर हल्ले होतात. 6 मे 2025 रोजी कच्छी जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॉम्बस्फोटात 7 सैनिक ठार झाले, ज्याचा आरोप BLA वर ठेवण्यात आला. बलुचिस्तानचा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्वामुळे तो पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील प्रांत मानला जातो. येथील अस्थिरता आणि स्वतंत्रतेच्या मागण्या भविष्यातही पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात. बलुचिस्तान हे नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असून, येथे कोळसा, तांबे, सोने आणि नैसर्गिक वायू यांचे मोठे साठे आहेत . तरीही, हा प्रांत आर्थिकदृष्ट्या मागासलेला मानला जातो, आणि स्थानिक लोकसंख्येमध्ये विकासाच्या अभावामुळे असंतोष आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

India Pakistan War: स्वागत नहीं करोगे हमारा! भारताच्या INS विक्रांतची एन्ट्री, पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं!

India vs Pakistan War: बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget