एक्स्प्लोर

India Pak War : भारताविरुद्ध लढा राहिला पाकिस्तानातच गृहकलह सुरु, शाहबाज शरिफ यांच्या विरोधात आंदोलनाचा भडका

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली :  भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं काल रात्री भारतामधील 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतानं त्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची HQ9 ही प्रणाली उद्धवस्त करुन टाकली होती. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीम प्रणालीपुढं पाकिस्तानचा निभाव लागला नव्हता. तरी देखील भारतावर हल्ला करण्याचं भ्याड धाडस पाकिस्ताननं केलं. पाकिस्तानला हा प्रयत्न देखील महागात पडला आहे. भारताच्या पश्चिम सीमेवरील राज्यांमध्ये पाकिस्ताननं ड्रोन, मिसाईल आणि विमानांद्वारे हल्ला करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला. मात्र, भारताच्या एस-400 एअर डिफेन्स प्रणालीनं पाकिस्तानच्या मिसाईल, ड्रोन आणि विमानांना पाडलं आहे. भारताविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ आणि सेनाप्रमुख असीम मुनीर अडचणीत आले आहेत. 

पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या  विरोधात आंदालन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे. 

पाकिस्तानच्या सेना प्रमुखाची उचलबांगडीची शक्यता 

पाकिस्तानचा सेना प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये त्याला ताब्यात घेऊन देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी आर्मीकडून जनरल शहीर शमशाद मिर्झा याच्याकडे सेना प्रमुखपद सोपवलं जाऊ शकतं. असीम मुनीर यानं वैयक्तिक अजेंड्यापोटी पाकिस्तानाला विनाशाच्या मार्गावर नेलं. मुनीरला ताब्यात घेत त्याला अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. असीम मुनीर याच्यावर लष्करी कोर्टाकडून कारवाई केली जाऊ शकते. इमरान खानला देखील लवकरच तुरुंगातून बाहेर काढलं जाऊ शकतं.  इमरान खानच्या समर्थकांनी त्याला सोडण्याची मागणी सुरु केली आहे. त्याचवेळी अमेरिकेनं देखील पाकिस्तानला परिस्थिती आणखी बिघडवू नका, असा इशारा दिला आहे. 

भारताने पाकिस्तानच्या 16 शहरांवर हल्ला

भारताने पाकिस्तानच्या इस्लामाबादसह लाहोर, सियालकोट सारख्या 16 शहरांवर हल्ला केला आहे. एकीकडे वायू दलाचा आणि लष्कराचा हल्ला तर दुसरीकडे नौदलानेही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतानं केलेल्या पलटवारामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारतानं  कराची पासून लाहोरपर्यंत हल्ले केले आहेत. तर, इस्लाबादपासून एबोटाबादपर्यंत हल्ले केले आहेत.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
सावधान! होर्मुझमधून होणारा 90 टक्के एलपीजी पुरवठा धोक्यात, कंपन्याना 700 कोटी रुपयांचा फटका, दरात वाढ होणार का? 
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
30 भारतीयांचा मृत्यू, महागाईत 2.5 टक्क्यांची वाढ, अमेरिका-इराण युद्धात भारताचे नेमके किती झाले नुकसान?
Nitin Gadkari : 'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
'आता हवेत उडणारी बस आणणार'; E20 नंतर काय आहे गडकरींचा प्लॅन? स्वतः सांगितलं
Aamir Khan Controversy : 'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन
'जो आमीर खानला संपवेल, त्याला 5 कोटी देणार'; जगद्गुरु परमहंस आचार्यांचे वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget