एक्स्प्लोर

India-Afghanistan: भारताने अफगाणिस्तानच्या भूमिकचं केलं स्वागत; तालिबानने ताबा घेतल्यानंतर प्रथमच द्विपक्षीय चर्चा

India-Afghanistan: भारत-अफगाणसंबंधीच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत एस. जयशंकर यांनी केलंय.

India-Afghanistan: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री मावलावी आमीर खान मुत्तकी यांच्यासोबत चर्चा केली. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय. भारत-अफगाणसंबंधीच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत एस. जयशंकर यांनी केलंय. पाकिस्ताननं दोन्ही देशांत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. 

भारताशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला तयार- शाहबाज शरीफ 

पाकिस्तानी दहशतवादावर भारताने जोरदार प्रहार केल्यावर आता पाकिस्तानी पंतप्रधान शांततेची भाषा बोलू लागलेत. भारताशी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेला तयार आहोत असं शाहबाज शरीफ यांनी म्हटलंय. कामरा एअरबेसला त्यांनी भेट दिली. त्यावेळी हे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे आधी भारतात दहशतवादी कारवाया करायच्या, मग भारताने दहशतवादावर प्रहार केल्यावर भारतावरच उलट लष्करी कारवाई करायची. मग भारताने तुफान मार दिल्यावर आता शांततेच्या थापा मारायच्या असे प्रकार करण्यात पाकिस्तानी राज्यकर्ते मश्गूल असल्याचं दिसतंय. मात्र भारताची भूमिका ठाम आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारताने पाकिस्तानला ठणकावलं आहे. 

गेल्या 48 तासांत सहा दशतवाद्यांना कंठस्नान-

ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरनं प्रत्युत्तर-

22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे  दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले होते. भारतानं यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर द्वारे प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला होता. याशिवाय सिंधू जल करार देखील स्थगित केला होता. सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला.  भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या जात नाहीत तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील, असं म्हटलं.

संबंधित बातमी:

Shehbaz Sharif on India Pakistan Conflicts: शाहबाज शरीफ म्हणाले, आम्ही शांततेसाठी चर्चा करण्यास तयार; भारतानेही जाहीर केली भूमिका

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget