एक्स्प्लोर

India China Face Off | सीमेवर घुसखोरी झाली नाही, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!

भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी काल सर्वात मोठं वक्तव्य केलं. आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला आहे. सर्वपक्षीय बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं, पण या वक्तव्यामुळे उत्तर मिळण्याऐवजी नवे प्रश्नच निर्माण झाले आहेत. त्यावरुन राजकारणही सुरु झालं आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर नेमकं झालंय तरी काय, कशी झाली ही घटना हे सगळे प्रश्न देशाला पडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सीमेवरील हिंसक झटापटीबाबत वक्तव्य समोर आलं. देशातल्या 20 राजकीय पक्ष प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला." पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहेत. कारण गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाचं जे अधिकृत वक्तव्य आलं होतं त्यात याच्या बरोबर विरोधी सूर आहे.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घटनेनंतर फोनवर बातचीत झाली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य जाहीर केलं होतं. 6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या मिलिट्री कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसा घडवली.

आता पंतप्रधान म्हणतात ते खरं की परराष्ट्र मंत्रालय म्हणतं ते खरं हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण घुसखोरी न करता आपल्या हद्दीत चीन कसं काय बांधकाम करत होता? मोदींच्या वक्तव्यानंतर राहुल गांधींनीही दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.

मोदींच्या कालच्या वक्तव्यानंतर तिकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेला दावा भारतासाठी आणखी डोकेदुखीचा आहे.

चीनने गलवान खोरं हा आमच्याच हद्दीत असल्याचा दावा केला आहे. भारताने आमच्या हद्दीत घुसखोरी केली आणि या ठिकाणी बांधकाम सुरु केलं. 6 जूनला झालेल्या बैठकीत इथून निगराणी पथकं हटवण्याचं भारताने मान्य केलं होतं. पण तसं झालं नाही, असं चीनने म्हटलं आहे.

चीन भारतावरच या घटनेचं खापर फोडत आहे. पण मुळात जर आपले पंतप्रधानच म्हणत असतील की घुसखोरी झाली नाही तर मग चीनला आता खोटं तरी कसं पाडायचं?

India-China | सीमाभागात ना घुसखोरी झाली, ना कोणती पोस्ट दुसऱ्याच्या ताब्यात : पंतप्रधान मोदी

या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? - नेमकी कुणी कुणाच्या ह्दीत घुसखोरी केली - जर कुणीच घुसखोरी केली नाही, तर मग गोळीबार न होता सीमेवर 20 जवान कसे शहीद झाले? - पंतप्रधानांच्या वक्तव्यात आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात फरक का?

देशाच्या संवेदनशील मुद्द्यावर सर्व राजकीय प्रश्नांना एकत्रित करण्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यावर आता राजकीय पक्षांचं एकमत होतं की त्यातून अजून संभ्रम वाढतोय हे आता पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Rahul Gandhi on PM Modi | चीनच्या आक्रमकतेपुढे मोदींची शरणागती : राहुल गांधी Galwan Valley | गलवान खोरं आमचं, एलएसीसुद्धा आमच्याच भूभागात, चीनच्या उलट्या बोंबा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget