एक्स्प्लोर

India China Border Conflict : भारत चीन सीमावादावरुन काँग्रेसची मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, श्वेतपत्रिका काढून संसदेत चर्चा घडवण्याची मागणी

India-China Border Dispute : भारत चीन सीमा मुद्यावरुन राजकीय धग अजूनही शांत होताना दिसत नाही. गलवान चकमकीला तीन वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने काल (19 जून) काँग्रेसने याबाबत काही गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित केले आहेत.

India China Border Conflict : भारत चीन सीमावादाच्या (India China Border) प्रकरणात काँग्रेसने (Congress) मोदी सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या घटनेला तीन वर्षे काल पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काँग्रेसने मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. मोदी सरकारने याबाबत श्वेतपत्रिका (White Paper) काढावी, संसदेत सविस्तर चर्चा घडवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

भारतीय लष्कराने सीमेवर 65 पैकी 26 टेहाळणी नाक्यांचा ताबा गमावला हे खरं आहे का असाही सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. याबाबत लेह लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत मनीष तिवारी यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. 

सीमेवरील परिस्थिती शांत मात्र राजकीय वातावरण तापलेलं

19 जून 2020 मध्ये गलवान सीमेवर भारत आणि चीन दरम्यान चकमक घडलेली होती. त्यानंतर बराच काळ हा तणाव कायम होता. सीमेवरची स्थिती काहीशी शांत असली तरी त्यावरुन राजकारण मात्र शांत होताना दिसत नाही. गेल्या तीन वर्षात याबाबत 18 वेळा चीन-भारत सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे, पण त्यानंतरही सरकार अधिकृत माहिती संसदेला का देत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी 19 जानेवारी 2020 ला केलेल्या वक्तव्यातून एक प्रकारे चीनला क्लीन चिटच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. 

काँग्रेसकडून मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

भारत चीनमध्ये तणाव झाल्यानंतर सलग काही महिने हा तणाव कायम राहिला. कधी लडाख सीमेवर तर कधी अरुणाचल सीमेवर चीनने कुरापती काढल्या. भारतीय हद्दीतली दोन हजार चौरस किमी जमीन चीनने बळकावली हे खरं आहे का..आपण ती परत मिळवू शकलो आहे का याबाबत सरकारने माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

पावसाळी अधिवेशनातही भारत-चीन सीमावादाचा मुद्दा गाजणार?

संसदेच्या बजेट अधिवेशनातही विरोधकांनी सातत्याने भारत-चीन सीमेबाबत सविस्तर चर्चेची मागणी केली होती. पण सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता. गोंधळातच कामकाज वाहून गेलं होतं. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा तापणार का हे पाहावं लागेल. 

हेही वाचा

India China Border : उत्तराखंड सीमेजवळ चीनची नवीन खेळी, LAC पासून 11 किमी अंतरावर गाव वसवलं

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget