Narendra Modi Speech Highlights : देशात एक देश एक निवडणूक धोरण राबवणे गरजेचे : नरेंद्र मोदी
PM Narendra Modi Speech Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी देशाचा विकास, कायदे आणि नियमांतील बदल यावर भाष्य केलं.

Background
मुंबई : आज संपूर्ण देशात 78 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केल आहे. सध्या पूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
Narendra Modi Speech Live Updates : देशातील प्रत्येक आस्थापनेनं वर्षात फक्त दोन धोरणात्मक बदल करावेत, नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरून आवाहन
आपण बदलाबाबत बोलत आहोत. आज देशात साधारण 3 लाख वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य, जिल्हा, केंद्र पातळीवर वेगवेगळ्या 3 लाख संस्था आहेत. मी या सर्व संस्थांना आवाहन करतो की, वर्षात आपल्या स्तरावर फक्त दोन बदल करा. कोणताही विभाग असो फक्त एका वर्षात दोन बदल करा. जनतेचं आयुष्य सुकर करणारे हे बदल हवेत. हे बदल प्रत्यक्ष राबवावेत. हे बदल प्रत्यक्षात आल्यास एका वर्षात 25 चे 30 लाख बदल घडून येतील. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल घडतील तेव्हा सामान माणसाचा विश्वास वाढेल. त्याची शक्ती राष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत होईल. त्यामुळेच या संस्थांनी बदल घडवण्यासाठी हिंमत करून पुढे यावे. सामान्य नागरिक जर पंचायत पातळीवर अडचणींचा सामना करत असेल तर त्या अडचणी दूर करायला हव्यात.
Narendra Modi Speech Live Updates : सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन
मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो की, आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे. मी युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपयांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे. तुम्ही सरकारला सांगा की अमूक-अमूक गोष्टीची विनाकारण अडचण होती. ती दूर केली तर काहीही फरक पडणार नाही, हे पत्राद्वारे सांगा.
























