एक्स्प्लोर

 Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार; अमित शाहांचा विश्वास 

Amit Shah Exclusive : येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये (Gujarat) सध्या ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, ते पाहून भाजपच्याच (BJP) बाजूने लोकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व पाहून आम्ही आमच्याच पक्षाचे पूर्वीचे विक्रम मोडून पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचं सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला आहे. येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांची एबीपी अस्मिताने खास मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे. परंतु, अनेक संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपला 131 ते 139 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यावर बोलताना अमित शाह यांनी सांगितले की, गुजरातच्या लोकांमध्ये, तरुणांमध्ये,  शेतकऱ्यांमध्ये आणि विशेषत: गुजरातच्या महिलांमध्ये विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हे पाहता आम्ही निश्चितपणे आमचे सर्व विक्रम मोडीत काढू आणि बहुमताने सरकार स्थापन करू. 

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकीआधी गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, "समान नागरी कायदा लागू करणे हे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची देशातील जनतेशी असलेली बांधिलकी आहे.  समान नागरी कायदा असावा हे जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे. परंतु, काँग्रेसकडून पहिल्यापासूनच याला विरोध केला जातोय. काँग्रेसने पहिल्यापासून तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे.  राज्यघटनेत कलम 44 अन्वये गार्डियन प्रिंसिपल दिले गेले आहे, ज्यामध्ये राज्यघटनेच्या रचनाकारांची अशी अपेक्षा होती की भविष्यात देशाच्या संसदेने, देशाच्या विधिमंडळांनी समान नागरी कायदा आणावा. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.  

"बूथ कार्यकर्त्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि निष्ठेने सरकार चालवताना केलेल्या चांगल्या कामाचे फळ भाजपला मिळेल. त्यामुळे प्रचंड बहुमताने जुना विक्रम मोडीत काढत भारतीय जनता पक्ष 2022 च्या निवडणुका पुन्हा जिंकेल. आम आमदी पक्षाकडून गुजरातमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. परंतु, 1960 पासून गुजरातमध्ये शिक्षण मोफत आहे. ज्याप्रकारे गुजरातमध्ये विकास झाला आहे, गुजरातमध्ये तुम्हाला ज्या प्रकारचे निकाल मिळाले आहेत, देशातील गुजरात सोडा, 370 ची कलम नरेंद्र मोदी इतक्या खंबीरपणे उखडून टाकतील याची कल्पनाही देशात कोणीही करू शकत नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. 

अमित शाह म्हणाले, "भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा संकल्प हा आहे की, जगात देशाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावे. 2047 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी भारत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असेल. प्रत्येक क्षेत्रात भारताने प्रगती केली पोहिजे. 

महत्वाच्या बातम्या

 Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होणार का? अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed : आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, देशमुखांनी काय केली मागणी?Umesh Patil Solapur : दोन पाटलांचा वाद विकोपाला उमेश पाटलांचं अजिंक्यराणा पाटलांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 16 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut On congress : काँग्रेस आपला हरवण्यासाठी मैदानात, केजरीवालांचं मत राऊतांनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
'यापेक्षा लोकशाहीला सर्वात मोठा धोका होऊच शकत नाही, जेव्हा...' अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्... नाशिकमधील अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?
Sanjay Raut : नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत 150 लोक मरण पावलेत, संजय राऊतांचा खळबळजनक दावा, PM मोदींसह रेल्वेमंत्र्यांवर निशाणा 
F 35 Fighter Jet : एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
एलाॅन मस्क ज्याला 'कचरा' म्हणाले तेच F-35 फायटर जेट अमेरिका भारताला का विकू इच्छिते? जगातील सर्वात महागडे, तरीही 5 वर्षांत 9 वेळा क्रॅश!
Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.