एक्स्प्लोर

Pahalgam Attack: महिलांमध्ये योद्ध्याची भावना..., पहलगामात 'सिंदूर' गमावणाऱ्यांबद्दल भाजप खासदार रामचंद्र जांगडांचं वादग्रस्त विधान; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर हरियाणा भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जांगडांनी महिलांनी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते, त्यामुळे कमी लोकांचा मृत्यू झाला असता, असंही म्हटलं आहे.

Pahalgam Attack: हरियाणाचे भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पहलगाममध्ये महिलांनी दहशतवाद्यांशी सामना करायला हवा होता. पण त्यांच्यात वीरांगनासारखा भाव नव्हता. जर महिलांनी हात जोडण्याऐवजी त्या लढल्या असत्या तर कमी लोक मारले गेले असते. अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे शौर्य दाखवण्याचे आवाहन जांगडा यांनी महिलांना केले. त्यांच्या या विधानामुळे आता वाद निर्माण झाला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भिवानी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान हे विधान करण्यात आले. यावेळी आमदार कपूर बाल्मिकी, आमदार घनश्याम सराफ आणि जिल्हाप्रमुख वीरेंद्र कौशिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार रामचंद्र जांगडा यांना कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. महिलांनी दहशतवाद्यांशी लढायला हवे होते का, यावर उत्तर देताना ते म्हणाले, "अगदीच लढायला हवे होते. जर महिला हात जोडण्याऐवजी लढल्या असत्या, तर दहशतवादी मारले गेले असते. पर्यटकांचे कमी मृत्यू झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अग्निवीर योजना' याचसाठी सुरू केली आहे, असेही ते पुढे म्हणालेत. जर तेथे पोहोचलेला प्रत्येक पर्यटक अग्निवीर असता, तर त्यांनी दहशतवाद्यांनाच घेरलं असतं. एकही दहशतवादी परत गेला नसता, असंही जांगडा यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्यातील आरोपी दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत. पण सैन्याने दहशतवाद्यांचे तळ आणि त्यांचे म्होरके संपवले आहेत, असल्याचं वक्तव्य जांगडा यांनी केलं आहे.

काय म्हणाले रामचंद्र जांगडा ?

रामचंद्र जांगडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखे शौर्य दाखवण्याचे आवाहन जांगडा यांनी महिलांना केले. जर महिलांनी हात जोडण्याऐवजी त्या लढल्या असत्या तर कमी लोक मारले गेले असते. चर्चासत्रानंतर, रामचंद्र जांगडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींची ओळख आणि अटक या प्रश्नाला टाळले. ते म्हणाले की, जरी आरोपी पकडले गेले नसले तरी आमच्या सैन्याने त्यांचे लपण्याचे ठिकाण आणि म्होरके यांना उद्ध्वस्त केले आहे.

दीपेंद्र हुड्डांचा रामचंद्र जांगडा यांच्यावर हल्लाबोल

काँग्रेसचे लोकसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी रामचंद्र जांगडा यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. दीपेंद्रने सोशल मिडिया एक्सवर वर लिहिले, पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्यांचं कुंकू पुसलं, आता त्यांची मर्यादा उद्ध्वस्त करण्याचं काम हरियाणाचे भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा करत आहेत. हे अत्यंत घृणास्पद विधान आहे. भाजपकडून शहीद जवानांच्या कुटुंबाचा सतत अपमान होत आहे. यावर आळा घातला गेला पाहिजे." रामचंद्र जांगडा यांच्या विधानावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या विधानामुळे महिलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका होत आहे. तर, काहींनी त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget