एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू
ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळं 36 बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना, उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडली आहे.
![गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू Gorakhpur Tragedy36 Children Dead Due To Oxygen Supply Cut Off In Brd Hospital Uttar Pradesh गोरखपूर दुर्घटना: मृतांचा आकडा 36 वर,ऑक्सिजन बंद केल्याने बालकांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/11150332/gorakhpur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लखनऊ: ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यामुळं 36 बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना, उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये हा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे 9 ऑगस्टलाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता.
बिल थकवल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद
66 लाखांचं बील थकवण्यात आल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या फर्मनं काल रात्रीपासूनच हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. लिक्विड ऑक्सिजन देखील गुरुवारपासून बंद होते. त्यात आज सगळे सिलेंडरही संपले. एनएनयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 तर इन्सेफेलाइट्स वॉर्डमधील 12 बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान यानंतरही रुग्णालय ऑक्सिजनची तरतूद न करू शकल्यानं मृतांचा आकडा 36 वर पोहोचला.
निष्काळजीपणामुळे 36 मुलांचा बळी
मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचं नाव पुष्पा अॅण्ड सन्स असल्याचं समजतं आहे. अनेक रिपोर्टनुसार, मेडिकल कॉलेजमध्ये सेंट्रल पाइपलाईननं लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. पण गुरुवारी अचानक हा पुरवठा थांबवण्यात आला.
रुग्णालयातील आयसीयू आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये काल रात्री 11.30 वा. ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आला. जो शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कायम होता. हा पुरवठा थांबला असल्याचं माहित असूनही ऑक्सिजनची दुसरी कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे रुग्णालयातील 36 मुलांचा हकनाक बळी गेला.
दरम्यान, 9 ऑगस्टलाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या रुग्णालयाची पाहणीही केली होती. याबाबतचं ट्वीट देखील त्यांनी केलं होतं.
देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय.
36 मुलांचा हकनाक बळी घेणाऱ्या कंपनी आणि रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion