एक्स्प्लोर

सियाचीनमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या लेफ्टनंट जनरल पीएन हून यांचं निधन

पीएन हून यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तिरंगा फडकावला होता.

चंदीगड : सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चं नेतृत्त्व करणारे लेफ्टनंट जनरल पीएन हून यांचं निधन झालं. चंदीगडमध्ये सोमवारी (6 जानेवारी) संध्याकाळी वयाच्या 91 व्या वर्षी पीएन हून अर्थात प्रेम नाथ हून यांनी अखेरचा श्वास घेतला. लेफ्टिनेंट जनरल पीएन हून यांच्यावर दोन दिवसांपासून पंचकुलाच्या कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी 6 जानेवारी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांना मृत घोषित केलं. 1984 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात पीएन हून यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. पीएन हून यांच्या नेतृत्त्वात भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीनमध्ये तिरंगा फडकावला होता. पीएन हून यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1929 रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये झाला होता. परंतु फाळणीच्या वेळी त्यांचं कुटुंब भारतात आलं. 1987 मध्ये पश्चिम कमांडे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले होते. यानंतर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काय आहे ऑपरेशन मेघदूत? भारताची गुप्तचर यंत्रणा रॉकडून माहिती मिळाली होती की, 17 एप्रिल 1984 रोजी पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार आहे. जर पाकिस्तानने सियाचीनवर ताबा मिळवला तर पाकला पराभूत करण्यासाठी भारतीय सैन्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. ही माहिती मिळताच भारतीय सैन्य अलर्ट झालं. यानंतर 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. विशेष बाब म्हणजे बर्फात घातले जाणारे कपडे आणि काही मोजक्या उपकरणांसह ते 12 एप्रिलच्या रात्रीच भारतीय सैन्याजवळ पोहोचले होते. जगातील सर्वात उंच युद्धभूमीतील संघर्षाची ही पहिलीच घटना होती. याला 'ऑपरेशन मेघदूत' नाव देण्यात आलं होतं. या ऑपरेशनने भारताच्या सामरिक विजयाचा पाया रचला होता. सियाचीन भौगोलिक स्थिती अशी आहे की, भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
Nitin Gadkari: शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaibhav Naik On Narayan Rane : पक्षविरोधी काम करणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई करावी
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha
Bacchu Kadu Vs Radhakrishna Vikhe : गाडी फोडण्यावरून बक्षिसांचे राजकारण,बच्चू कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांची ऑफर
Jammu Kashmir Doctor Terror: फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
Alliance Politics: 'नाशिकमध्ये MNS सोबत कोणतीही चर्चा नाही'; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती फेटाळली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, गाडीत मोबाईल बंद ठेवा; अधिकाऱ्याचा फोन, दमानियांची पहिली प्रतिक्रिया
Swami Samarth Math Thane: घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांचा मठ हटवण्याच्या हालचाली, अविनाश जाधव संतापले, म्हणाले, 'स्वामींच्या नादी लागू नका नाहीतर...'
Nitin Gadkari: शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
शेतकरी आता हायड्रोजनदाता होणार; नितीन गडकरींनी लातूरमधून बळीराजाला दिला प्रगतीचा मंत्र
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
Sameer Bhujbal vs Suhas Kande: भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
भाजपला सोबत घेऊन समीर भुजबळ शिवसेनेला हादरा देणार; नाशकात भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पुन्हा पेटणार
Australia Social Media Ban : ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान म्हणाले...
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधान अल्बनीज म्हणाले...
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
सांगली : विक्रीला ठेवलेल्या फ्रीजमधील सिलिंडरचा स्फोट अन् क्षणात अवघं कुटुंब उद्ध्वस्त, हसत्या खेळत्या कुटुंबाचा सत्यानाश
Nashik Crime: 'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
'तुझा गेमच वाजवतो' म्हणणाऱ्याचा नाशिक पोलिसांनी उतरवला 'माज'; गोळीबाराच्या मास्टरमाइंडला सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या
Embed widget