एक्स्प्लोर

जुनी खुन्नस, नवी खेळी; पटेल आणि शाह यांच्यातील नेमका वाद काय?

मात्र या सगळ्या प्रकरणाला वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी पटेल आणि शाह यांच्या नात्याला आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत अमित शाहांनी अहमद पटेल यांना आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली : राजकारणातील अनेक खेळींची तुलना बुद्धिबळाच्या चालींशी करत असतो. राज्यसभा निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर दोन्ही वजीर एकमेकांसमोर उभे आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य आहेत. त्यांच्यासमोर आज अमित शाह यांच्या रुपाने तेवढाच तगडा आणि त्याच खेळात वाकबगार असलेला उमेदवार आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक कधी नव्हे ते इतकी रोमांचक बनली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीनंतरची काँग्रेस आणि भाजपमधील ही बिग फाईट आहे. अहमद पटेल पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यसभेत आता भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपला एकही जागा सहजरित्या गमवायची नाही. त्यामुळे गुजरातच्या राज्यसभा निवडणुक अहमद पटेल यांना कडवं आव्हान दिलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाला वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी पटेल आणि शाह यांच्या नात्याला आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत अमित शाहांनी अहमद पटेल यांना आव्हान दिलं आहे. एक काळ असा होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एक वर्षासाठी तडीपार होते. त्यांना गुजरातबाहेर राहावं लागलं होतं. यामागे अहमद पटेल यांची मोठी भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. सोहराबुद्दीन एन्काऊंटरमध्ये अमित शाह यांना तुरुंगवारी करावी लागली. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अमित शाह यांच्यावर कारवाई झाली. या कारवाईला अहमद पटेल यांनीच खतपाणी दिल्याची चर्चा आहे. तसंच इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी अमित शाह यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लागला. यूपीए सरकारमुळेच त्यांना तडीपार व्हाव लागल्याचं म्हटलं जातं. या दोन प्रकरणांमुळेच दोघांमध्ये दशकभरापासून वितुष्ट आलं. दरम्यान, डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अहमद पटेल यांच्यासारखा तगडा नेता पराभूत झाला तर तो काँग्रेससाठी नैतिक मनोधैर्य खच्ची करणारा असेल. त्यामुळे ही निवडणूक अहमद पटेल पर्यायाने काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget