एक्स्प्लोर

Delhi Air Pollution : सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पर्यावरण मंत्र्यांची तातडीची बैठक

केंद्रानं आज बोलावलेल्या राज्यांच्य़ा एकत्रित बैठकीत काही ठोस उपाय निघतो की केवळ पुन्हा एकमेकांवर खापर फोडून चालढकल केली जाते हे पाहावं लागेल. 

दिल्ली : देशाची राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. त्यात सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) या सगळ्याची गंभीर दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारांचे कान उपटले आहेत. केंद्र सरकारने आज हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची (Commission for Air Quality Management) बैठक बोलावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही बैठक आज सकाळी 10 वाजता पर्यावरण मंत्रालयात होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाचे अध्यक्ष एमएम कुट्टी आणि पर्यावरण सचिव आरपी गुप्ता यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या पर्यावरण मंत्रालयाशी संबंधित अधिकारीही सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर बुधवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी प्रदूषण रोखण्याची रणनीती तयार करण्यात येणार आहे. सोमवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी परदेश दौऱ्यावरून परतल्यावर तातडीची बैठक घेतली होती.

सुप्रीम कोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारला फटकारलं आहे. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो, पण तरी उपाय योजना होत नसल्यानं कोर्टानं खंत व्यक्त केली. तसंच केंद्र सरकारला दिल्लीसह सर्व संबंधित राज्यांची एक तातडीची बैठक घेण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. उद्या म्हणजे 17 नोव्हेंबरला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

दिल्लीत प्रदूषणामुळं एक आठवडाभरासाठी शाळा बंद आहेत. सर्व सरकारी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले गेलेत. बांधकामाची कामं 14 ते 17 नोव्हेंबर पूर्णपणे बंद असणार आहेत.

पंजाब हरियाणातले शेतकरी या दिवसात पाचट जाळतात. पण या पाचटामुळे होणारं प्रदूषण हे केवळ 10 टक्केच असल्याचं आज केंद्र सरकारच्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं. याबद्दल जी समिती नेमली गेली होती, त्या समितीनी अधिकतर प्रदूषण उद्योग, गाड्यांची वाहतूक यामुळेच होत असल्याचं म्हटलंय.

प्रदूषण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा विचार का करत नाही असाही सवाल यावेळी कोर्टानं विचारला. त्यावेळी दिल्ली सरकारनं म्हटलं की केवळ आम्ही हा निर्णय करुन उपयोग नाही, दिल्लीची सीमा लहान असल्यानं आजूबाजूच्या राज्यांनीही या निर्णयाला साथ दिली पाहिजे.

त्यामुळे आता केंद्रानं बोलावलेल्या राज्यांच्य़ा एकत्रित बैठकीत काही ठोस उपाय निघतो की केवळ पुन्हा एकमेकांवर खापर फोडून चालढकल केली जाते हे पाहावं लागेल. 

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!
पवार, वाघमारे, आठवले, वडकुते, ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन फिरवला, तरीही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक उमेदवार दिलाच, माघार घेण्यासाठी ठेवली 'ही' अट
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
Embed widget