एक्स्प्लोर

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

CSIR CASE  Exam : मुलाखतीसाठी जी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये नावांचा गोंधळ घातला असून प्रवर्गच जाहीर करण्यात आला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

मुंबई : देशात पूजा खेडकर प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता इतरही परीक्षांमध्ये तशाच पद्धतीचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला जातोय. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. CSIR 2023 परीक्षेच्या मुलाखतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नसून नावांमध्ये गोंधळ आहे आणि जात प्रवर्गच जाहीर न केल्यामुळे यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. तसेच या संस्थेत सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांचा आणि नातेवाईकांचाच भरणा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात काही विद्यार्थांनी CSIR आणि पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारही केली आहे. 

CSIR CASE परीक्षेसाठी 2023 मध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या 444 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी या वर्षी फेब्रुवारीमध्ये टीअर 1 परीक्षा पार पडली. ही परीक्षा 350 गुणांची वैकल्पिक स्वरूपाची होती. तर टीअर 2 परीक्षा ही वर्णनात्मक असून ती 150 गुणांसाठी जुलै महिन्यात घेण्यात आली. आता त्याचा निकाल लागला असून 100 गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया CSIR संस्थेकडूनच घेण्यात येत आहे. 

CSIR परीक्षेमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे CSIR मध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीच मुले आणि नातेवाईक असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे या परीक्षेच्या पारदर्शकतेवर सवाल उपस्थित होत आहे. या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने पंतप्रधान कार्यालयाच्या अख्यत्यारित असलेल्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांचा आरोप काय आहे? 

- ज्या विद्यार्थ्यांनी टिअर 1 परीक्षेमध्ये 350 पैकी 290 हून अधिक गुण मिळवले आहे त्या विद्यार्थ्यांना 150 गुणांच्या वर्णनात्मक परीक्षेमध्ये मात्र 35 टक्केही गुण मिळाले नाहीत. 

- त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी या आधी यूपीएससी आणि इतर केंद्रीय सेवांच्या परीक्षेमध्ये 50 टक्क्यांहून अधिक गुण मिळवल्याचा इतिहास आहे. पण तरीही त्यांना 35 टक्केही गुण मिळाले नाहीत.

- UPSC परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणं शक्य झालं नाही. तर दुसरीकडे CSIR मध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मुले मात्र यामध्ये सहजपणे पात्र ठरल्याचा आरोप आहे. 

- मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांचे गुण जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळे या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

- तसेच टिअर 1 आणि टिअर 2 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नावं ही पूर्ण छापण्यात आली होती. तर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आडनावे ही छापण्यात आली नाहीत. 

- भरतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार लपविण्यासाठी उमेदवारांची आडनावे त्यांच्या संबंधित श्रेणींसह गहाळ असल्याचा आरोप आहे. नेमका हाच प्रकार पूजा खेडकर प्रकरणात या आधी झाला होता. 

- त्याचपद्धतीने मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा जात प्रवर्गही (OBC, ST, SC, PH) जाहीर करण्यात आला नाही. म्हणजे आरक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे की नाही याबद्दल कोणतीही पारदर्शकता नाही. 

- CSIR मध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांचा या मुलाखतीच्या यादीमध्ये समावेश आहे. त्यांच्या नावांची यादीसह अनेकांनी CSIR आणि पंतप्रधान कार्यालयाकडे याची तक्रारही केली आहे.

- या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज असून परीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, भरती प्रक्रियेच्या निष्पक्षतेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष द्यावं अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे. 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Singh on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा दावा, मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा लोकसभेत दावा
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget