एक्स्प्लोर

Covid Vaccination | पहिल्या दिवशीच्या लसीकरणात गंभीर दुष्परिणाम नाहीत; स्वदेशी लसीवर शंका घेणाऱ्यांना अमित शहांचा टोला

Covid Vaccination: शनिवारी देशभरात एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम समोर आले नाहीत. यावरुन स्वदेशी लसीवर शंका घेण्याऱ्यांना अमित शाह यांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्ली: देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत. एकीकडे सगळं जग भारताच्या लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करत असताना देशात मात्र यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

मंत्र्यांनी का नाही घेतली लस, विरोधी पक्षांचा प्रश्न देशातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना योध्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचवेळी यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याचं समोर येतंय. लसीकरणाच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही काँग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला विचारले की, "ही लस सुरक्षित आहे तर सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही?"

Covid Vaccination | ...त्यामुळं लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही; महाराष्ट्र आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

मनिष तिवारी म्हणाले की, "ज्या-ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे त्या-त्या ठिकाणच्या प्रमुखांनी सर्वप्रथम ती लस घेतल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहचला. इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सर्वप्रथम लस घेतली. त्यामुळे ती लस सुरक्षित असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत गेला आहे."

मनिष तिवारी पुढे म्हणाले की, "इतर सर्व देशातही हीच पार पाडण्यात आली. आपल्या देशात हे चित्र पहायला मिळाले नाही. यावरुन एक प्रश्न पडतो की ही लस इतकी सुरक्षित आहे तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही? असं झालं असतं तर नागरिकांमध्ये एक संदेश गेला असता.

केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर

विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे आरोप करताच त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत अनेकांनी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "कोरोनाविरोधात सर्वात यशस्वी लढाई भारताने लढली आहे. मला दु:ख आहे की काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. माझी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून संपूर्ण देशाला या लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास दिला पाहिजे. संपूर्ण देशाला लसीकरणाच्या या अभियानात जोडलं पाहिजे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "लसीकरणाच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली याचा आनंद आहे. या दोन स्वदेशी लसींच्या सोबतच आणखी चार लसी लवकरच उपलब्ध होणार आहेत. भारतातील या लसी लवकरच जगभरात निर्यात केल्या जातील."

कोरोनावरील लसीकरण सुरू होत असताना 'कोव्हॅक्सिन' विरोधात हायकोर्टात याचिका

काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मात्र ही लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. अमरिंदर सिंह यांनी लसीच्या बाबतीत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलंय.

काल करण्यात आलेल्या लसीकरणानंतर अद्याप त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नसल्याने या स्वदेशी लसीबद्दल विश्वासार्हता वाढली आहे. देशातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या वेगवेगळ्या स्तरावरील परिक्षणानंतर सरकारने या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.

Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget