एक्स्प्लोर

Covid Vaccination | पहिल्या दिवशीच्या लसीकरणात गंभीर दुष्परिणाम नाहीत; स्वदेशी लसीवर शंका घेणाऱ्यांना अमित शहांचा टोला

Covid Vaccination: शनिवारी देशभरात एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम समोर आले नाहीत. यावरुन स्वदेशी लसीवर शंका घेण्याऱ्यांना अमित शाह यांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्ली: देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत. एकीकडे सगळं जग भारताच्या लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करत असताना देशात मात्र यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

मंत्र्यांनी का नाही घेतली लस, विरोधी पक्षांचा प्रश्न देशातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना योध्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचवेळी यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याचं समोर येतंय. लसीकरणाच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही काँग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला विचारले की, "ही लस सुरक्षित आहे तर सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही?"

Covid Vaccination | ...त्यामुळं लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही; महाराष्ट्र आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

मनिष तिवारी म्हणाले की, "ज्या-ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे त्या-त्या ठिकाणच्या प्रमुखांनी सर्वप्रथम ती लस घेतल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहचला. इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सर्वप्रथम लस घेतली. त्यामुळे ती लस सुरक्षित असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत गेला आहे."

मनिष तिवारी पुढे म्हणाले की, "इतर सर्व देशातही हीच पार पाडण्यात आली. आपल्या देशात हे चित्र पहायला मिळाले नाही. यावरुन एक प्रश्न पडतो की ही लस इतकी सुरक्षित आहे तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही? असं झालं असतं तर नागरिकांमध्ये एक संदेश गेला असता.

केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर

विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे आरोप करताच त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत अनेकांनी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "कोरोनाविरोधात सर्वात यशस्वी लढाई भारताने लढली आहे. मला दु:ख आहे की काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. माझी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून संपूर्ण देशाला या लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास दिला पाहिजे. संपूर्ण देशाला लसीकरणाच्या या अभियानात जोडलं पाहिजे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "लसीकरणाच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली याचा आनंद आहे. या दोन स्वदेशी लसींच्या सोबतच आणखी चार लसी लवकरच उपलब्ध होणार आहेत. भारतातील या लसी लवकरच जगभरात निर्यात केल्या जातील."

कोरोनावरील लसीकरण सुरू होत असताना 'कोव्हॅक्सिन' विरोधात हायकोर्टात याचिका

काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मात्र ही लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. अमरिंदर सिंह यांनी लसीच्या बाबतीत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलंय.

काल करण्यात आलेल्या लसीकरणानंतर अद्याप त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नसल्याने या स्वदेशी लसीबद्दल विश्वासार्हता वाढली आहे. देशातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या वेगवेगळ्या स्तरावरील परिक्षणानंतर सरकारने या लसींच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.

Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget