एक्स्प्लोर

कोरोना व्हायरस आला कुठून? चीनचे भारतातील राजदूत म्हणतात...

कोरोना व्हायरस भयंकर असला तरी व्हायरसबद्दलचे गैरसमज आणि अफवा त्याहून भयंकर असल्याचं चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोन व्हायरसमुळे 1900 हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे, तर 72 हजारहून अधिक लोकांना याचा प्रादूर्भाव झाला आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. चीनने तयार केलेला व्हायरस चीनवरच उलटल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना व्हायरस निघाला असल्याचंही बोललं जात होतं. मात्र कोरोना व्हायरस मानव निर्मित नसून नैसर्गिक आहे, असं भारतातील चीनचे राजदूत सुन वीदोंग यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरस बाबत अद्याप पूर्ण माहिती देखील उपलब्ध नाहीये. कोरोना व्हायरस भयंकर असला तरी व्हायरसबद्दलचे अनेक गैरसमज आणि अफवा त्याहून भयंकर असल्याचं वीदोंग यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोन व्हायरसमुळे 1900 हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे, तर 72 हजारहून अधिक लोकांना याचा प्रादूर्भाव झाला आहे.

वीदोंग यांनी पुढे म्हटलं की, या गंभीर परिस्थितीत भारत आणि चीन यांच्यात संवाद कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती शी जिनपींग यांना पत्रही लिहीलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनच्या स्टेट काऊन्सलर यांच्याशी फोनवर चर्चाही केली आहे. भारतातील कोणत्याही नागरिकाला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. चीनमधील विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना नियमित जेवण आणि मास्कसारखं गरजेचं सामान पोहोचवलं जात आहे.

Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही कोरोना व्हायरसची लढाई नक्की जिंकू. हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या घटली आहे. रोज 5000 रुग्ण आढळणारी संख्या आता कमी होऊन 2000 आली आहे, असं वीदोंग यांनी म्हटलं.

वुहानमध्ये 10 दिवसात 10 मोबाईल रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. याठिकाणी रोज सात हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जावी, हा प्रयत्न आहे. 16 हजार लोकांच्या मदतीने वुहानमधील प्रत्येक घराचं सर्वेक्षण केलं जात आहे, जेणेकरुन कोरोनाच्या रुग्णांची माहिती मिळावी.

Corona Virus | चीनमधील कोरोना बाधितांच्या संख्येत घट, WHOची माहिती

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. Corona Virus | चिकन खाल्ल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, सोशल मीडियावरील अफवांचं केंद्र सरकारकडून खंडन काय काळजी घ्याल? तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या. Coronavirus | 'कोरोना व्हायरस' होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget