कुरघोडी करणाऱ्या चीनला उपरती, मोदींच्या नेतृत्त्वात भारत शक्तिशाली, 'ग्लोबल टाईम्स'मध्ये स्तुतीसुमनं!
नवी दिल्ली : चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणारी शक्ती, असल्याचं चीनने मान्य केलेय.

नवी दिल्ली : चीनमधील सरकारी वृत्तपत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणारी शक्ती, असल्याचं चीनने मान्य केलेय. चीनमधील ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राच्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचे कौतुक करण्यात आलेय. ग्लोबल टाइम्समध्ये शांघायच्या फुडन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे संचालक झांग जियाडोंग यांचा लेख छापण्यात आलाय. यामध्ये भारताने मागील चार वर्षांत केलेल्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचं कौतुक करण्यात आले आहे. भारताची वेगानं होणारी आर्थिक वाढ, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंध, खासकरुन चीनसोबतच्या दृष्टिकोनातील बदलांबद्दल सविस्तर लिहिण्यात आलेय.
झांग यांनी आपल्या लेखात उदाहरण देताना म्हटले की, "चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असमतोलावर चर्चा करताना भारतीय प्रतिनिधींनी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु आता ते भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत." वेगानं वाढणारा आर्थिक आणि सामाजिक विकासासोबत रणनीतीबाबत भारत अधिक आत्मविश्वासाने काम करत आहे. आता भारत 'भारत नॅरेटिव्ह'वर जोर दतोय आणि त्याला चालना देण्यास जास्त सक्रीय झालाय.
ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखात म्हटलेय की," राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताने पाश्चिमात्य देशांसोबतच्या लोकशाही सहमतीवर जोर देण्याच्या पलीकडे जाऊन लोकशाही राजकारणाची 'इंडियन स्पेशिएलिटी' अधोरेखित करण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये सध्या लोकशाही राजकारणावर अधिक भर दिला जात आहे." भारतात होत असलेला बदल हा ऐतिहासिक आहे. भारताने आपली प्रतिमा बदलण्यासोबत राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या 'विश्व गुरु' म्हणून काम करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते.
ग्लोबल टाईम्सच्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये अमेरिका, जपान आणि रशियासारख्या मोठ्या जागतिक महासत्तासोबत संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. परराष्ट्र धोरणात भारताच्या धोरणात्मक विचारसरणीत आणखी एक बदल झाल्याचेही अधोरेखित करण्यात आलेय. भारत एक महान शक्ती आणि महासत्ताकडे वाटचाल करत आहे.
झांग यांनी ग्लोबल टाईम्समधील आपल्या लेखात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सत्ता संभाळली, त्यावेळी त्यांनी जपान, अमेरिका, रशिया आणि अन्य देशांसह क्षेत्रीय संगठणासोबत भारताच्या संबंध सुधारण्यावर भर दिला, त्यासाठी खास रणनितीचा वापर केला. भारताने नेहमीच स्वत:ला जागतिक शक्ती मानलं.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















