लग्नाच्या फक्त चार तासांनंतर वधूचा रस्त्यावर करुण अंत, कार-ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू; दूध विक्रेत्याच्या घरावर शोककळा
वडील हंसराज यांनी सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांच्या मधल्या मुलीने रूपाचे लग्न लावून दिले होते. कुटुंबाला खाण्यासाठी पुरेसे अन्नही मिळत नाही.

वैशाली येथे झालेल्या रस्ते अपघातात मधेपुराच्या रूपासह चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे चार वाजता कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेमुळे हा अपघात झाला. रुपाचे लग्न सोमवारी रात्री नवगछिया येथे झाले. लग्नाच्या चार तासांनंतर वधूचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी भागलपूर गंगा घाटावर रूपावर (वय 20) अंत्यसंस्कार करण्यात आले. चुलत भाऊ अखिलेश कुमारने चितेला अग्नी दिला.
लव्ह मॅरेज केलेल्या बायकोची रात्रीची पोस्ट, मी केस केलीय, तू आता जेलमध्ये जा, 'बेस्ट ऑफ लक'; पोलिस भावाची महिला पोलिस स्टेशनमध्ये मारहाण, नवऱ्यानं दुसऱ्या दिवशी गळ्याला दोरी लावली #lovemarriage #marriage https://t.co/rvwb2yXV1J
— ABP माझा (@abpmajhatv) April 10, 2025
मुलीच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन
रूपाचे वडील हंसराज मंडल यांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. ते गुरेढोरे पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हंसराज यांना सहा मुले आहेत, चार मुली आणि दोन मुलगे. तीन मुलींची आधीच लग्न झाली होती. रूपा ही चौथी मुलगी होती. दोन्ही मुलगे अजून लहान आहेत. मोठा मुलगा कन्हैया 12 वर्षांचा आणि धाकटा मुलगा अजय कुमार 9 वर्षांचा आहे. लग्न हुंडा न घेता झाले होते. मुलीच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. वडील गायी आणि म्हशी पाळतात. दूध विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
सुहागरात्रीलाच बायको म्हणाली, 'मैं किसी और की हूं अमानत'! रात्रीतच सासरवाडीत फोन लावला, तर तिकडूनही दमदाटी! हबकलेल्या नवरदेवानं शेवटी.. https://t.co/ff7yiubYnQ
— ABP माझा (@abpmajhatv) April 10, 2025
बहिणीने लग्न ठरवले होते
वडील हंसराज यांनी सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांच्या मधल्या मुलीने रूपाचे लग्न लावून दिले होते. दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, कुटुंबाला खाण्यासाठी पुरेसे अन्नही मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण आहे. दुसऱ्या मुलीचे लग्न मुलीनेच ठरवले होते. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता निरोप देण्यात आला. घरी जात असताना हाजीपूरमध्ये अपघात झाला. माझी मुलगी रूपा वारली. सासरच्या मंडळींपैकी तीन जणांचा मृत्यू झाला. मृताच्या बहिणीने सांगितले आहे की, लग्न केल्यानंतर सासरी जात असताना अपघात झाला.
इतर महत्वाच्या बातम्या























