एक्स्प्लोर

Bihar Election Poll of Polls | एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांचीच हवा, नितीश कुमारांसाठी धोक्याची घंटा

Bihar Election Poll of Polls बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलने महागठबंधनचे सरकार सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलनी व्यक्त केलाय.

पटणा: एबीपी न्यूज-सी व्होटर एक्झिट पोल तसेच देशातील इतर अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार सत्तेत येण्याची जास्त शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. देशातील अनेक एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी तेजस्वी यादव विराजमान होण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूज-सी व्होटर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला 104 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे तर विरोधी पक्ष महागठबंधनला 108-131 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये चिराग पासवान याच्या लोकशक्ती जनता पक्षाला 1-3 जागा मिळतील असाही अंदाज आहे. एबीपी-सी वोटर सर्व्हेनुसार एडीएला 37.7 टक्के मते तर महागठबंधनला 36.3 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तसेच इतर पक्षांना 26 टक्के मते मिळण्याचा संभव आहे. बिहारच्या सत्तेची कमान हाती घ्यायची असेल तर बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे.

टुडेज चाणक्य-सीएनएन न्यूज 18 या पोलने तेजस्वी यादव नेतृत्व करत असलेल्या महागठबंधनला 180 जागा तर एनडीएला 55 तर अन्य पक्षांना 8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. टुडेज चाणक्य ने महागठबंधनला 44 टक्के तर एनडीएला 34 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया महागठबंधनला 139-161 जागा तर एनडीए ला 69-91जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त लोक जनशक्ती पक्षाला 3-5 जागा आणि इतरांनाही 3-5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पोलनुसार आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला 44 टक्के आणि एनडीएला 39 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ-सी वोटर टाइम्स नाऊ-सी वोटरच्या पोलनुसार एनडीए ला 116 जागा तर विरोधी महागठबंधनला 120 आणि लोक जनशक्ती पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे

रिपब्लिक टीव्ही-जन की बात आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला राज्यात 128 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे तर सत्तारुढ एनडीए ला 104 जागा तर लोक जनशक्ती पक्षाला सात जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

टीवी9 भारतवर्ष ने एनडीए ला 115 जागा तर महागठबंधन ला 120 तसेच लोकजनशक्ती पक्ष तसेच अन्य पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंत इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या 44 टक्के लोकांनी तेजस्वी यादव यांनाच आगामी मुख्यमंत्र्याच्या रुपात पाहणे पसंत केले आहे. तर 35 टक्के लोकांनी नितीश कुमार यांना पुन्हा एकदा संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राजदने 18 टक्के मते घेऊन 80 जागा पटकावल्या होत्या तर जेडीयुने 11 टक्के मते घेऊन 71 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 24 टक्के मते घेऊन 53 जागा जिंकल्या होत्या तर कॉंग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या आणि 7 टक्के मते घेतली होती.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Election 2020 Exit Poll Results : बिहार निवडणुकीत एनडीए-महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर; कोणलाही स्पष्ट बहुमत नाही

Bihar Election 2020 | बिहार निवडणुकीचा तिसरा टप्पा ठरवणार सरकार कोणाचे? मतदानाला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget