एक्स्प्लोर

Bihar Election 2020 | राहुल गांधींच्या ट्वीटची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार भाजप; काय आहे प्रकरण?

Bihar Election 2020 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. अशातच आज राहुल गांधींनी केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटची भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही बोललं जात आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यासंदर्भात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लोकांना मतदानाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचसोबत राहुल गांधी यांनी लोकांना महागठबंधनला मत देण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधींचं हे ट्वीट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

भारतीय जनता पार्टी आता राहुलच्या या ट्वीट संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. भाजपचं म्हणणं आहे की, 'मतदानाच्या दिवशी अशाप्रकारे राजकीय पक्षाला मत देण्याचं आवाहन करणं आचार संहितेचं उल्लंघन आहे.'

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी म्हणजेच एकूण 71 जागांसाठी मतदान सुरु आहे. मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, 4 जागांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत, 26 जागांसाठी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 5 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारांना खास आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी जनतेला शुभेच्छा देत सांगितलं की, 'यावेळी न्याय, रोजगार, शेतकरी-मजूरांसाठी महागठबंधनला मत द्या.

बिहार निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनचा दल (आरजेडी), काँग्रेस आणि वाम दल सहभागी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरजेडीचे 42, काँग्रेसचे 21, भाकपाचे आठ उमेदवार महागठबंधनाच्या वतीने रिंगणात उतरले आहेत.

31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आली

पहिल्या टप्प्यात 1066 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निर्णय होणार आहे. ज्यापैकी 114 महिला आहेत. दोन कोटी 14 लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत आपलं मत नोंदवणार आहेत. बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात 31 हजार 371 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.

एका वोटिंग सेंटरवर 1000 मतदार असतील

कोरोनाच्या संकटात पार पडणाऱ्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. निवडणुकीसाठी आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एका वोटिंग सेंटरवर मतदारांची संख्या 1600 वरून कमी करत 1000 करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget