एक्स्प्लोर

कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन

Bangladesh Violence : शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश सोडला आणि भारतात आश्रय घेतला, अशी माहिती मिळत आहे.

Bangladesh Violence : बांगलादेशात (Bangladesh News) सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. आरक्षणाबाबतचं आंदोलन चिघळलं, त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. पुढे आंदोलन एवढं चिघळलं की, शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन काही वेळातच शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केलं. सध्या शेख हसीना कुठे आहेत? त्यांना कुणी आश्रय दिलाय? याबाबत कोणाला, काहीच माहिती नाही. 

बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचार आणि विरोधानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. सरकार पडल्यानंतर हसीना भारतात आल्या. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. जोपर्यंत हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळत नाही, तोपर्यंत शेख हसीना भारतातच राहणार आहेत. सोमवारी त्यांचं सरकार पडल्यानंतर भारत सरकारनं त्यांना अंतरिम स्थलांतराची परवानगी दिली आहे. मात्र, अशा संकटातून वाचण्यासाठी शेख हसीना भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. 

कुटुंबाच्या हत्येनंतर बचावलेल्या शेख हसीना भारतात आश्रयाला

शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्या, त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतानं मदत देऊ केलीही. पण यापूर्वीही संकटकाळी भारत शेख हसीना यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. यापूर्वी 1975 मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्षे दिल्लीत राहिल्या होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. त्या दिवशी शेख हसीना यांच्या कुटुंबातील 17 जणांची हत्या करण्यात आली होती. मात्र, शेख हसीना आणि त्यांची बहीण त्यावेळी जर्मनीत असल्यानं त्यांचा जीव वाचला होता.

इंदिरा गांधी सरकारनं दिला राजकीय आश्रय 

संकटात सापडलेल्या शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं भारतात राजकीय आश्रय दिला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्ष दिल्लीत राहिल्या. कालांतरानं परिस्थिती सामान्य झाल्यावर शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला. पुढे बांगलादेशात येऊन वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि शेख हसीना आपल्या बहिणीसोबत बांगलादेशात आल्या. 

शेख हसीना 1981 मध्ये बांगलादेशला परतल्या

शेख हसीना यांची 16 फेब्रुवारी 1981 रोजी अवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्या मे 1981 मध्ये भारतातून बांगलादेशात पोहोचल्या. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात झाली. मात्र, 1980चं दशक त्यांच्यासाठी चांगलं नव्हतं. त्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली कोठडीत डांबण्यात आलं होतं. नोव्हेंबर 1984 पर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. एवढं सगळं होऊनही शेख हसीना यांनी पराभव स्वीकारला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीगनं 1986 मध्ये निवडणुकीत भाग घेतला. शेख हसीना यांची संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.

1996 मध्ये शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. 2001 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यानंतर 2008 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर 2014, 2018 आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून त्यांनी पंतप्रधानपद स्वतःकडे ठेवलं. 

बांगलादेशात आरक्षणावरून हिंसाचार 

आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आरक्षणाचा निर्णय बदलला, असं असूनही बांगलादेशात हिंसाचार आणि निदर्शनं थांबलेली नाहीत. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी ढाका येथे मोर्चाही काढला. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कुणी नेसल्या साड्या, तर कुणाच्या हातात ब्लाऊज; बकरी, मासे अन् बरंच काही; आंदोलकांनी लुटलं शेख हसीनांचं घर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकांत पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Embed widget