एक्स्प्लोर
... तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा

नवी दिल्ली : 'भारत माता की जय' या घोषणेवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे. योगगुरु रामदेव बाबांनीही आता यात उडी घेतली आहे. 'काही लोक म्हणतात की डोकं उडवलं तरी भारत माता की जय म्हणणार नाही, मात्र त्यांना माहिती नाही, कायद्याचे हात बांधलेले नसते, तर लाखो शीर आतापर्यंत धडावेगळी झाली असती' असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं आहे. 'जो धर्म भारत माता की जय बोलणं योग्य मानत नाही, तो धर्म देशास हितावह नाही' असं मत रामदेव बाबांनी हरियाणाच्या रोहतकमधील सभेमध्ये व्यक्त केलं. विशेष म्हणजे सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. देशभक्तीचं उदाहरण देत ओवेसींवर निशाणा साधताना ते स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री
गळ्यावर सुरी ठेवून ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही असं उद्दाम वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. सरसंघचालक मोहन भागवत यांना लातूरमधील जाहीर सभेत ओवेसींनी उत्तर दिलं. ‘मै भारत माता की जय नही बोलूँगा, कभी नही बोलूँगा, क्या कर लिजीएगा भागवत’ असं खुलं आवाहन ओवेसींनी भागवतांना दिलं. ‘गळ्यावर सुरी ठेवून कोणी जबरदस्ती भारत माता की जय म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही,’ असंही ओवेसी म्हणाले.सौदी अरेबियात 'भारत माता की जय' घोषणेने मोदींचं स्वागत
ओवेसींच्या वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटले होते. अनेक स्तरांतून ओवेसींवर टीका झाली, तरीही एमआयएम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे.संबंधित बातम्या :
'गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही'
मानेवर सुरा ठेवला, तरी म्हणेन 'भारत माता की जय'
‘भारत माता की जय’वरुन जावेद अख्तरांचे ओवेसींना खडे बोल!
'ओवेसीची जीभ कापणाऱ्याला १ कोटीचं बक्षीस', भाजप नेत्याचं वादग्रस्त आवाहन
ओवेसीची गर्दन कायद्यानं उडवा, ‘सामना’मधून टीकास्त्र
आणखी वाचा























