एक्स्प्लोर

Ayodhya verdict Judges : अयोध्या-बाबरी खटल्यातील पाचपैकी तीन न्यायमूर्तीं एक राज्यसभा खासदार, एक राज्यपाल अन् एक आयोगाचे अध्यक्ष!

निवृत्तीकडे वाटचाल सुरु झाल्यानंतर सनदी अधिकारी, सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्या होणाऱ्या शासकीय नियुक्त्या गेल्या काही वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी सातत्याने येत आहेत.

Ayodhya verdict Judges : निवृत्तीकडे वाटचाल सुरु झाल्यानंतर सनदी अधिकारी, सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्या होणाऱ्या शासकीय नियुक्त्या गेल्या काही वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी सातत्याने येत आहेत. देशाच्या इतिहासातील सर्वोच्च आणि भविष्याच्या राजकारणाची नांदी ठरलेल्या ऐतिहासिक अयोध्या-बाबरी खटल्यातील (Ayodhya-Babri Masjid dispute case) पाचपैकी तीन न्यायमूर्तींच्या निवृत्तीनंतर तातडीने झालेल्या शासकीय नियुक्त्या राजकीय भूवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. 

अयोध्या खटल्याचा निकाल देशाचे 46 वे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने नोव्हेंबर 2019 मध्ये दिला होता. या खंडपीठात रंजन गोगोई यांच्यासह, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती अशोक भुषण आणि अब्दुल नझीर यांचा समावेश होता. यामधील डी. वाय. चंद्रचुड विद्यमान सरन्यायाधीश आहेत, तर शरद बोबडे सरन्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. 

खंडीपाठातील पाचपैकी तीन न्यायमूर्तींमध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (राज्यसभा खासदार), अब्दुल नझीर (आंध्र प्रदेश राज्यपाल) आणि अशोक भुषण (राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण) या ठिकाणांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, देशाच्या इतिहासात प्रथमच दोन माजी सरन्यायाधीशांची (राज्ंयपाल म्हणून पी. सथशिवम आणि राज्यसभा खासदार म्हणून रंजन गोगोई) नियुक्ती मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच माजी न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, ही नियुक्ती पहिली नसून यापूर्वीही या बाबरी खटल्यातील दोन न्यायमूर्तींची मोदी सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा देशात दुरगामी परिणाम करणाऱ्या खंडपीठामध्ये तसेच निकालामध्ये समावेश होता. 

न्यायमूर्ती अब्दुल नझीर

न्यायमूर्ती अब्दुल नझीर हे तिहेरी तलाक प्रकरण (Triple Talaq case), अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरण (Ayodhya-Babri Masjid dispute case), नोटाबंदी प्रकरण (demonetisation) आणि गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे (right to privacy is a fundamental right) असे मानणारे निकाल यासह अनेक ऐतिहासिक निकालांचा भाग होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती अवघ्या दीड महिन्यात झाल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. 

न्यायमूर्ती अशोक भूषण 

न्यायमूर्ती अशोक भुषण 4 जुलै 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. न्यायमूर्ती अशोक भूषण हे देखील राम मंदिर बाबरी मशीद प्रकरणात निकाल देणाऱ्या पाच सदस्यीय खंडपीठाचा भाग होते. मोदी सरकारकडून अशोक भूषण यांची राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरण (Chairperson of National Company Law Appellate Tribunal) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती सुद्धा निवृत्तीनंतर अवघ्या चार महिन्यांच्या आत करण्यात आली. केंद्र सरकारने न्यायाधिकरण भूषण यांची चार वर्षांसाठी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती भूषण यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल किंवा ते 70 वर्षांचे होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल तोपर्यंत ते पदावर असतील. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई 

भारताचे 46 वे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी पदावरून निवृत्त झाले. त्यांच्याच अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्या बाबरी खटल्यात ऐतिहासिक निकाल दिला होता. रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सात महिन्यांमध्ये त्यांच्या माजी कनिष्ठ सहाय्यकाने लैंगिक छळाचा आरोप केला होता. निवृत्तीनंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेवर खासदारकी देण्यात आली. 

दरम्यान, कॅग अहवालातून तत्कालिन युपीए दोन सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या तत्कालिन कॅग प्रमुख विनोद राय यांना मोदी सरकारकडून देशाच्या बँकिंग बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget