एक्स्प्लोर

ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान

या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं.

मुंबई : मुंबईत 1942 मध्ये भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि 'करेंगे या मरेंगे'चा दिलेला मंत्र 9 ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं. उषा मेहता ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान भारतातील विविध भागात इंग्रजांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनाला जोर आला होतो. अशावेळी उषा मेहता या 'भारत छोडो' आंदोलनाला आवाज देण्यासाठी भूमिगत रेडिओ स्टेशन चालवत होत्या. खरंतर उषा मेहता या गांधीजींच्या शिष्या होत्या. 1927 मध्ये त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. ऑगस्ट क्रांती आंदोलनात त्यांचा मोलाचा वाटा होता. भूमिगत रेडिओद्वारे संदेश पाठवण्याचं काम त्या करत होत्या. परंतु त्याची कुणकुण इंग्रजांना लागली आणि तपासणी सुरु झाली. यातच त्यांना अटक होऊन चार वर्षांचा कारावास भोगावा लागला. अरुणा असफ अली ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान यासोबत ऑगस्टक्रांती आंदोलनात अरुणा असफ अली यांनी मोलाची कामगिरी बजावली. या चळवळीच्या वेळी अनेक मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनाची कमान अरुणा असफ अली यांनी सांभाळली. 9 ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना न जुमानता मुंबईच्या गोवालिया टँकवर तिरंगा फडकवला. या घटनेमुळे इंग्रजांनी अरुणा असफ अली यांना पकडून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणी केली. परंतु इंग्रजांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. याचाच फायदा घेत अरुणा असफ अली भूमिगत झाल्या आणि आंदोलनाला त्यांनी पाठबळ दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशसेवेची जबाबदारी कायम ठेवली. 1958 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर म्हणून निवडून आल्या. राष्ट्रसेवासाठी त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मातंगिनी हाजरा ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान मातंगिनी हाजरा हे एक असं नाव आहे जे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सन्मानाने घेतलं जात. 'भारत छोडो' आंदोलनात त्यांचा मोलाचा सहभाग होता, गांधीजींनी सुरु केलेल्या या आंदोलनात त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी होण्याचा त्यांचा एक उद्देश होता तो म्हणजे स्वातंत्र्य. त्यावेळी 8 डिसेंबरला तामलुकमध्ये झालेल्या एका आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात तीन स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले. याविरोधात जनतेने 19 डिसेंबरला मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला. या रॅलीसाठी मातंगिनी यांनी घरोघरी जाऊन पाच हजार लोकांना सहभागी केलं. हातात तिरंगा घेऊन या रॅलीचं नेतृत्व मातंगिनी करत होत्या. या रॅलीला विरोध करण्यासाठी इंग्रज सरकारकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात तीन गोळ्या लागून मातंगिनी शहीद झाल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाल्या आहेत. ताराराणी श्रीवास्तव ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान बिहारमधील ताराराणी श्रीवास्तव यांचा बालविवाह स्वातंत्र्यसेनानी फुलेंदू बाबू यांच्यासोबत झाला. त्यामुळे आपल्या पतीसोबत त्यांनीही या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. 'भारत छोडो' चळवळीमध्ये सहभागी होऊन त्या महिलांचं प्रतिनिधत्व करत होत्या. या चळवळीचा उद्देश होता सिवान ठाण्याच्या छतावरती तिरंगा फडवण्याचा. पोलिसांनी जमावाला थोपवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी फुलेंदू बाबूंनाही गोळी लागली आणि ते खाली कोसळले. ताराराणी यांनी आपल्या पतीच्या जखमेवर साडीने पट्टी बांधली आणि त्या परत चळवळीत सहभागी झाल्या आणि त्यांनी तिरंगा फडकवून आपल्या चळवळीचा उद्देश साध्य केला. पण जेव्हा त्या आपली पतीजवळ परत आल्या तोपर्यंत फुलेंदू बाबू शहीद झाले होते. त्यानंतरही ताराराणी श्रीवास्तव स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन देशासाठी लढत राहिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget