एक्स्प्लोर

ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान

या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं.

मुंबई : मुंबईत 1942 मध्ये भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केलेली 'छोडो भारत'ची गर्जना आणि 'करेंगे या मरेंगे'चा दिलेला मंत्र 9 ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. परंतु इतिहासाच्या पानावर त्यांचा कुठेही उल्लेख नसला तरीही त्यांच योगदान मोलाचं होतं. उषा मेहता ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान भारतातील विविध भागात इंग्रजांविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनाला जोर आला होतो. अशावेळी उषा मेहता या 'भारत छोडो' आंदोलनाला आवाज देण्यासाठी भूमिगत रेडिओ स्टेशन चालवत होत्या. खरंतर उषा मेहता या गांधीजींच्या शिष्या होत्या. 1927 मध्ये त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. ऑगस्ट क्रांती आंदोलनात त्यांचा मोलाचा वाटा होता. भूमिगत रेडिओद्वारे संदेश पाठवण्याचं काम त्या करत होत्या. परंतु त्याची कुणकुण इंग्रजांना लागली आणि तपासणी सुरु झाली. यातच त्यांना अटक होऊन चार वर्षांचा कारावास भोगावा लागला. अरुणा असफ अली ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान यासोबत ऑगस्टक्रांती आंदोलनात अरुणा असफ अली यांनी मोलाची कामगिरी बजावली. या चळवळीच्या वेळी अनेक मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनाची कमान अरुणा असफ अली यांनी सांभाळली. 9 ऑगस्टला त्यांनी इंग्रजांना न जुमानता मुंबईच्या गोवालिया टँकवर तिरंगा फडकवला. या घटनेमुळे इंग्रजांनी अरुणा असफ अली यांना पकडून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणी केली. परंतु इंग्रजांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. याचाच फायदा घेत अरुणा असफ अली भूमिगत झाल्या आणि आंदोलनाला त्यांनी पाठबळ दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशसेवेची जबाबदारी कायम ठेवली. 1958 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर म्हणून निवडून आल्या. राष्ट्रसेवासाठी त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मातंगिनी हाजरा ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान मातंगिनी हाजरा हे एक असं नाव आहे जे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सन्मानाने घेतलं जात. 'भारत छोडो' आंदोलनात त्यांचा मोलाचा सहभाग होता, गांधीजींनी सुरु केलेल्या या आंदोलनात त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी होण्याचा त्यांचा एक उद्देश होता तो म्हणजे स्वातंत्र्य. त्यावेळी 8 डिसेंबरला तामलुकमध्ये झालेल्या एका आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात तीन स्वातंत्र्यसेनानी शहीद झाले. याविरोधात जनतेने 19 डिसेंबरला मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला. या रॅलीसाठी मातंगिनी यांनी घरोघरी जाऊन पाच हजार लोकांना सहभागी केलं. हातात तिरंगा घेऊन या रॅलीचं नेतृत्व मातंगिनी करत होत्या. या रॅलीला विरोध करण्यासाठी इंग्रज सरकारकडून गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात तीन गोळ्या लागून मातंगिनी शहीद झाल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाल्या आहेत. ताराराणी श्रीवास्तव ऑगस्ट क्रांतीतील रणरागिणी : स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान बिहारमधील ताराराणी श्रीवास्तव यांचा बालविवाह स्वातंत्र्यसेनानी फुलेंदू बाबू यांच्यासोबत झाला. त्यामुळे आपल्या पतीसोबत त्यांनीही या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. 'भारत छोडो' चळवळीमध्ये सहभागी होऊन त्या महिलांचं प्रतिनिधत्व करत होत्या. या चळवळीचा उद्देश होता सिवान ठाण्याच्या छतावरती तिरंगा फडवण्याचा. पोलिसांनी जमावाला थोपवण्यासाठी लाठीचार्ज आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी फुलेंदू बाबूंनाही गोळी लागली आणि ते खाली कोसळले. ताराराणी यांनी आपल्या पतीच्या जखमेवर साडीने पट्टी बांधली आणि त्या परत चळवळीत सहभागी झाल्या आणि त्यांनी तिरंगा फडकवून आपल्या चळवळीचा उद्देश साध्य केला. पण जेव्हा त्या आपली पतीजवळ परत आल्या तोपर्यंत फुलेंदू बाबू शहीद झाले होते. त्यानंतरही ताराराणी श्रीवास्तव स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन देशासाठी लढत राहिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget