एक्स्प्लोर

Ashok Gehlot : आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधानांना पत्र लिहावं, सरकार भारत जोडो यात्रेला घाबरलं; अशोक गेहलोतांचा निशाणा 

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला मोदी सरकार घाबरल्याचे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

Bharat Jodo Yatra COVID Protocol: जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. त्यामुळं भारत सरकारनं सावध पवित्रा घेतलाय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहित भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra)  थांबवण्याचं आवाहन केले आहे. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेला मोदी सरकार घाबरल्याचे वक्तव्य गेहलोत यांनी केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहावं असा पलटवार अशोक गेहलोत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक गेहलोत 

राजस्थानमधील भारत जोडो यात्रा 21 डिसेंबरला सकाळी पूर्ण झाली आहे. परंतू भाजप आणि मोदी सरकार भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं घाबरले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय आपल्या पत्रात म्हटले आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की वाढत्या जनसमर्थनाच्या भीतीनं भारत जोडो यात्रेला अडथळा आणण्याचा भाजपचा हेतू असल्याचे गेहलोत म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिलं पंतप्रधानांना पत्र लिहावं

अशोक गेहलोत  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीचा संदर्भ दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये रॅली काढली होती. तिथे कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नसल्याचे गेहलोत म्हणाले. कोविडच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधानांनी बंगालमध्ये मोठ्या प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश राजकीय नसेल, त्यांना कोरोनाची चिंता असेल, तर त्यांनी पहिले पंतप्रधानांना पत्र लिहायला हवे असेही गेहलोत म्हणाले.

आरोग्यमंत्र्यांच्या पत्रानंतर काँग्रेसची सरकारवर जोरदार टीका  

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारत जोडो यात्रेनं भाजपला हादरा दिला आहे. हे सर्व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केले जात असल्याचे चौधरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Coronavirus : नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं राहुल गांधींना पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget