एक्स्प्लोर

शांतता, मुख्यमंत्री आंदोलनाला बसलेत..

या आंदोलनाचं मूळ आहे 19 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत. दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना केजरीवाल यांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये आपच्या दोन आमदारांनी थप्पड लगावल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उपोषणाला बसलेत...देशात इतरत्र कुठे असे उद्गार काढले तर लोक त्याला वेड्यात काढतील. पण दिल्लीकरांना मात्र आता याची पुरती सवय झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैंजल यांच्या कार्यालयाबाहेरुन ते हटायलाच तयार नाहीत. चार महिन्यांपासून अघोषित संप पुकारणाऱ्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी आदेश द्या ही त्यांची मागणी आहे. अधिकारी सहकार्य करत नाहीत, त्यामुळे जनतेच्या हिताची कामं अडकून आहेत हा त्यांचा आरोप आहे. केजरीवालांच्या आंदोलनाचं मूळ या आंदोलनाचं मूळ आहे 19 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत. दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना केजरीवाल यांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये आपच्या दोन आमदारांनी थप्पड लगावल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केजरीवाल सरकारविरोधात असहकाराचं कडक पाऊल उचललं आहे. हे अधिकारी मंत्र्यांना आता भेटायलायच नाही म्हणत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या रुटीन मीटिंगवरही अधिकारी बहिष्कार टाकत आहेत. जे काही थोडंफार काम सुरु आहे ते लेखी कम्युनिकेशनवरच सुरु आहे. गेल्या चार महिन्यांपासून अधिकारी आणि सरकारमधला हा संघर्ष कायम आहे.. आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजप, मोदी सरकार आमच्याविरोधात हा सगळा कट रचत असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे. केजरीवालांच्या या आंदोलनाला समर्थन म्हणून पक्षाने काल उपराज्यपालांच्या निवासस्थानावर मोर्चाही काढला. केजरीवालांना जनतेच्या हिताची पर्वा नाही : भाजप तर दुसरीकडे केजरीवाल हे केवळ धरना पॉलिटिक्स करतात, त्यांना जनतेच्या हिताची पर्वा नाही, असा भाजपने आरोप केला आहे. भाजपचे तीन आमदार आणि आपचे निलंबित आमदार कपिल मिश्रा हे केजरीवाल यांना उत्तर म्हणून कालपासून त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. आंदोलनाला उत्तर आंदोलन अशी कॉमेडी दिल्लीच्या राजकारणात सुरु आहे. भाजप आणि आपच्या या भांडणात काँग्रेसही मागे नाही. दिल्लीत केजरीवाल आणि काँग्रेस लोकसभेला एकत्र लढतील अशी कुजबूज सुरु असतानाच आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसनंही केजरीवालांवर जोरदार टीका केली आहे. केजरीवालाचं तिसरं आंदोलन केजरीवाल यांचं एकूण कारकीर्दीतलं हे तिसरं आंदोलन आहे. 2014 मध्ये ते पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हा दिल्लीतल्या रेल भवनासमोर रस्त्यावरच त्यांनी ठाण मांडून उपोषण केलं होतं. दिल्लीतलं पोलिस दल हे केंद्राच्या ताब्यात आहे, त्यावर राज्याचाही कंट्रोल असावा या मागणीसाठी हे आंदोलन होतं. 2015 मध्ये आपचं सरकार पुन्हा 70 पैकी 67 जागा निवडून आलं. त्यानंतर अगदी मागच्या महिन्यापर्यंत केजरीवाल या उपोषण, आंदोलनापासून दूर राहिले होते. पण आता गेल्या महिन्याभरातच त्यांची दोन आंदोलनं झाली आहेत. मागच्या महिन्यात 14 मे रोजी केजरीवाल आपच्या आमदारांसोबत याच उपराज्यपालांना भेटायला गेले होते. दिल्लीत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत ही मीटिंग होती. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊच दिलं नाही म्हटल्यावर त्यांनी तिथंच ठिय्या मांडला. केजरीवाल यांचं हे आंदोलन तीन तासच सुरु होतं. भाजपच्या इशाऱ्यावर उपराज्यपाल दिल्लीतल्या सीसीटीव्ही प्रोजेक्टला अडथळा आणत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर आता हे आणखी एक आंदोलन ते करत आहेत. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कारकीर्दीतलं हे तिसरं आंदोलन आहे. भाजपकडे बदला घेण्याची संधी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही. प्रत्येक नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपराज्यपालांची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळेच केजरीवालांचे हात बांधले गेले आहेत आणि मोदी लाटेतही दिल्लीत सपाटून मार खालेल्या भाजपला त्यांचा बदला घ्यायची संधी मिळत आहे. जोपर्यंत आमच्या सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मीटिंगना येणार नाही असा अधिकाऱ्यांचा पवित्रा आहे. त्यामुळे पेच कायम आहे. या सगळ्या गदारोळात दिल्लीकरांच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे. - दिल्लीतल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सिग्नेचर ब्रीजचा फंड अडकून पडलाय - घरोघरी रेशन पोहचवण्याची योजना कार्यान्वित होत नाहीय - सीसीटीव्ही बसवण्याच्या अत्यंत महत्वाच्या प्रोजेक्टलाही केराची टोपली दाखवली जातेय. आंदोलनाच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया केजरीवाल यांनी मागच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून रस्त्यावर आंदोलन केलं तेव्हाही अनेकांनी ओरड केली. तुमच्या आंदोलनामुळे सामान्यांना ट्रॅफिक जामचा त्रास का असेही प्रश्न उपस्थित झाले. यावेळी ते बैजल यांच्या कार्यालयात आंदोलन करत आहेत, तर आता हे एसीतलं आंदोलनही अनेकांना टोचतं आहे. मुळात असा कुठला देश, असं कुठलं राज्य तुम्हाला माहिती आहे का जिथे अधिकारी निवडून दिलेल्या सरकारला चार महिने भेटायलाच तयार नाहीत. केजरीवाल यांचा आडमुठेपणा, हटवादीपणा यावर आक्षेप असू शकतात, त्यावर टीकाही जरुर करावी. पण आज केजरीवाल यांना धडा शिकवण्यासाठी जे अधिकारी इतकी टोकाची भूमिका घेत आहेत त्या अधिकाऱ्यांचा आवाज खूनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी नेत्यांसमोर मात्र का निघत नाही याचाही विचार करायला हवा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!
मोठी बातमी : प्रफुल पटेल कुठे आहेत? पत्रकारांचा प्रश्न, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती कधी येतात, कधी जातात!

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andhra Pradesh Assembly Election: अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
अवघ्या 6 सेकंदांत मतदान, मध्यरात्रीनंतर 4 टक्के मते नोंदवली गेली; आंध्र प्रदेश निवडणुकीवरून अत्यंत गंभीर आरोप
Parth Pawar: सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रफुल पटेल कुठे आहेत तुम्हालाच माहिती, आता पार्थ पवार म्हणतात, तटकरे-पटेलांविरोधातील बातम्या निराधार!
Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
सोन्याच्या दरातील घसरण थांबेना, सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 15000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस, अवकाळीने झोडपलं; रस्त्यावर पाणी, वाहनं जागेवरच थांबली, पाहा PHOTOS
Chhatrapati Sambhajinagar Crime: मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता त्रस्त
West Bengal Election: बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
बंगालच्या सीएम ममता बॅनर्जींची राजकीय सल्लागार कंपनी I-PAC वर तीन महिन्यात दुसऱ्यांदा EDची छापेमारी; ऐन निवडणुकीत कारवाई
Pune Rain : पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
पुण्यात भरदिवसा अंधार, अवकाळी पावसानं झोडपलं, पुण्यातील जंगली महाराज रस्ता पाण्यात, ग्रामीण भागात गारपीट
Raghav Chadha: देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
देशातील महागाईनं पिचलेल्या 'आम आदमी'च्या ज्वलंत मुद्यावरून संसदेत रान उठवणाऱ्या खासदार राघव चड्ढांवर पक्षाचा थेट सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय? अजूनही दोन वर्ष खासदारकी
Embed widget