एक्स्प्लोर

लोकपाल बिल : अण्णा हजारे पुन्हा दिल्लीत उपोषणाला बसणार!

लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे. सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी मोदी सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्चित असा कायदा करण्यात आलेला नाही. अशा शब्दात अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. अण्णा हजारेंचं मोदींना पत्र
''भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत 2011 साली दिल्लीच्या रामलिला मैदानावर देशव्यापी आणि ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत 27 ऑगस्ट 2011 रोजी संसदेत 'सेन्स ऑफ हाऊस' नावाने ठराव पास करण्यात आला. ज्यामध्ये केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक् आणि सिटिझन चार्टर यांची नियुक्ती करण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायदा बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आज सहा वर्षांनंतरही देशात भ्रष्टाचार रोखणाऱ्या एकाही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली, तरीही उत्तर नाही''
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत तुम्ही अजून काहीही उत्तर दिलेलं नाही. संसदेत विरोधी पक्षात असताना तुम्हीही या कायद्याला संपूर्ण पाठिंबा दिला होता. 2014 साली तुमचा पक्ष सत्तेत आला. लोकपाल आंदोलनानंतर देशभरातील जनतेने मोठ्या अपेक्षेने तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. मी गेल्या तीन वर्षात तुम्हाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र तुम्ही अजून त्याला एकदाही उत्तर दिलं नाही आणि काही अंमलबजावणीही केली नाही. शिवाय कधी 'मन की बात'मध्येही त्याचा उल्लेख केला नाही, किंवा जनतेशी संवाद साधतानाही लोकपालचा विषय काढला नाही. मग भारत भ्रष्टाचारमुक्त कसा होईल?'' असं अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं आहे.
''तुमच्या करण्यात आणि बोलण्यात अंतर''
''विरोधीपक्षाचं सरकार आहे त्या राज्यात ठिक आहे. मात्र तुमचं सरकार असलेल्या राज्यातही तुमच्या पक्षाने लोकायुक्ताची नेमणूक केलेली नाही. यावरुन तुमची कायद्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट होते. तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल?'' असा सवाल अण्णा हजारेंनी केला आहे.
''देशाच्या भल्यासाठी पुन्हा आंदोलन''
''यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर माझं पुढचं पत्र दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाविषयी असेल. त्यानुसार देशाच्या भल्यासाठी मी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''पुढच्या पत्रात आंदोलनाची तारीख आणि जागा निश्चित करणार''
''गेल्या 35 वर्षांपासून मी आंदोलन करत आहे. मात्र कधीही कोणत्या पक्षासाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी आंदोलन केलं नाही. केवळ देशाच्या आणि जनतेच्याच भल्याचा विचार केला. गेल्या तीन वर्षांपासून तुमच्या सरकारला वारंवार पत्र लिहून लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती करणं, तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याविषयी अनेकदा मागणी केली. मात्र याला तुम्ही काहीही उत्तर दिलं नाही किंवा कोणती कारवाईही केली नाही. त्यामुळे आता दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन दिल्लीत चालूच ठेवलं जाईल. आंदोलनाची तारीख आणि ठिकाण पुढच्या पत्रात कळवलं जाईल'' असंही अण्णा हजारेंनी पत्रात पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :

विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट

… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
CBI च्या नव्या संचालकांच्या नियुक्तीवर महत्त्वाची बैठक, महाराष्ट्राच्या महासंचालकांचे नाव चर्चेत; राहुल गांधींचा विरोध, Note of Dissent सादर
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
एअर इंडियानं उचललं मोठं पाऊल, तब्बल 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमकं कारण काय? 
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
RBI  : सर्वोदय सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई, खराब आर्थिक स्थितीमुळे परवाना रद्द
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget