एक्स्प्लोर

लोकपाल बिल : अण्णा हजारे पुन्हा दिल्लीत उपोषणाला बसणार!

लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकऱ्यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे. सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी मोदी सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्चित असा कायदा करण्यात आलेला नाही. अशा शब्दात अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. अण्णा हजारेंचं मोदींना पत्र
''भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत 2011 साली दिल्लीच्या रामलिला मैदानावर देशव्यापी आणि ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत 27 ऑगस्ट 2011 रोजी संसदेत 'सेन्स ऑफ हाऊस' नावाने ठराव पास करण्यात आला. ज्यामध्ये केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक् आणि सिटिझन चार्टर यांची नियुक्ती करण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायदा बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आज सहा वर्षांनंतरही देशात भ्रष्टाचार रोखणाऱ्या एकाही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली, तरीही उत्तर नाही''
''सत्तेत येऊन तीन वर्ष झाली तरीही लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीबाबत तुम्ही अजून काहीही उत्तर दिलेलं नाही. संसदेत विरोधी पक्षात असताना तुम्हीही या कायद्याला संपूर्ण पाठिंबा दिला होता. 2014 साली तुमचा पक्ष सत्तेत आला. लोकपाल आंदोलनानंतर देशभरातील जनतेने मोठ्या अपेक्षेने तुमच्या नेतृत्वात तुमच्या पक्षाच्या हातात सत्ता दिली. मी गेल्या तीन वर्षात तुम्हाला अनेकदा पत्र लिहिली. मात्र तुम्ही अजून त्याला एकदाही उत्तर दिलं नाही आणि काही अंमलबजावणीही केली नाही. शिवाय कधी 'मन की बात'मध्येही त्याचा उल्लेख केला नाही, किंवा जनतेशी संवाद साधतानाही लोकपालचा विषय काढला नाही. मग भारत भ्रष्टाचारमुक्त कसा होईल?'' असं अण्णा हजारेंनी पत्रात लिहिलं आहे.
''तुमच्या करण्यात आणि बोलण्यात अंतर''
''विरोधीपक्षाचं सरकार आहे त्या राज्यात ठिक आहे. मात्र तुमचं सरकार असलेल्या राज्यातही तुमच्या पक्षाने लोकायुक्ताची नेमणूक केलेली नाही. यावरुन तुमची कायद्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट होते. तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल?'' असा सवाल अण्णा हजारेंनी केला आहे.
''देशाच्या भल्यासाठी पुन्हा आंदोलन''
''यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की, लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी नाही झाली तर माझं पुढचं पत्र दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाविषयी असेल. त्यानुसार देशाच्या भल्यासाठी मी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.'' असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.
''पुढच्या पत्रात आंदोलनाची तारीख आणि जागा निश्चित करणार''
''गेल्या 35 वर्षांपासून मी आंदोलन करत आहे. मात्र कधीही कोणत्या पक्षासाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी आंदोलन केलं नाही. केवळ देशाच्या आणि जनतेच्याच भल्याचा विचार केला. गेल्या तीन वर्षांपासून तुमच्या सरकारला वारंवार पत्र लिहून लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती करणं, तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याविषयी अनेकदा मागणी केली. मात्र याला तुम्ही काहीही उत्तर दिलं नाही किंवा कोणती कारवाईही केली नाही. त्यामुळे आता दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन दिल्लीत चालूच ठेवलं जाईल. आंदोलनाची तारीख आणि ठिकाण पुढच्या पत्रात कळवलं जाईल'' असंही अण्णा हजारेंनी पत्रात पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे.
संबंधित बातम्या :

विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट

… तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
Embed widget