एक्स्प्लोर

Interfaith Marriages : धर्मांतर न करता केलेला आंतरधर्मीय विवाह बेकायदेशीर; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Allahabad High Court : अशा प्रकारचे विवाह करणाऱ्या आर्य समाज आणि इतर संस्थांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत.

लखनऊ: धर्मांतर न करता करण्यात आलेले आंतरधर्मीय विवाह हे बेकायदेशीर असतील असा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याशी आर्य समाज मंदिरात विवाह केला होता. तो विवाह न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातील फौजदारी खटला रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला.

याचिकाकर्ता सोनू सहानूर याने त्याच्याविरोधातील फौजदारी खटला रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. आपण ज्या मुलीशी लग्न केलं होतं ती मुलगी आता प्रौढ झाली आहे, आर्य समाज मंदिरात हा विवाह केला होता असा दावा त्याने याचिकेतून केला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे बेकायदेशीर

न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांनी दिलेल्या निर्णयात असं नमूद केलं की अल्पवयीन व्यक्तीचा विवाह करून दिलेला आर्य समाजाचा विवाहप्रमाणपत्र कायदेशीर निकषांचे उल्लंघन करणारा आहे. आर्य समाज संस्था विवाहित जोडप्यांना, विशेषतः अल्पवयीन किंवा धर्मभिन्न व्यक्तींना, ठराविक शुल्कामध्ये विवाहप्रमाणपत्र देत आहेत, ही गंभीर बाब असून अशा प्रकारांचा तपास होणे गरजेचे आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

आर्य समाजसह इतर संस्थांच्या चौकशीचे आदेश

न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले की IPS दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली अशा संस्थांची चौकशी सुरू करण्यात यावी. या चौकशीचा अहवाल 29 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या चौकशीमुळे उत्तर प्रदेशातील अशा संस्थांवर कारवाई होण्याची शक्यता असून, सामाजिकदृष्ट्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संबंधित आरोपीविरुद्ध महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलिस ठाण्यात POCSO कायदा, अपहरण आणि बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून समन्सही बजावण्यात आले आहेत.

Arya Samaj Marriage : आर्य समाज विवाह म्हणजे काय?

आर्य समाज ही सुधारवादी हिंदू चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, ते वैदिक पद्धतीने, सोप्या विधीने विवाह लावतात. यामध्ये दोघेही हिंदू असणे किंवा हिंदू धर्मात धर्मांतर करूनच विवाह करणे आवश्यक असते. अल्पवयीन आणि धर्मभिन्न व्यक्तींना आर्य समाजात विवाह करता येत नाही, असा नियम आहे.

न्यायालयाने याआधीही स्पष्ट केलं होतं की फक्त आर्य समाज मंदिराचे प्रमाणपत्र विवाहाचा पुरावा मानता येणार नाही. अशा प्रमाणपत्राची कायदेशीर वैधता न्यायालयीन साक्षांवर अवलंबून असते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget