एक्स्प्लोर

अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला काय माहित आहे?

मुंबई: जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला फक्त निषेध नको, तर कारवाई करा अशाच भावना देशवासिय व्यक्त करत आहे. अनंतनागमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 जण जकमी आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या डहाणूच्या 2 तर गुजरातमधील वलसाडच्या 5 भाविकांचा समावेश आहे. दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून अनेक भाविक जातात. मात्र या यात्रेचं महत्त्व काय? अमरनाथ यात्रेच्या अख्यायिका काय? याबाबतचा स्पेशल रिपोर्ट - अमरनाथ यात्रेचं महत्त्व हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा 29 जून ते 7 ऑगस्ट यात्रा या शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी रजिस्ट्रेशन करतात. यंदा 29 जून ते 7 ऑगस्ट 2017 पर्यंत ही यात्रा चालणार आहे.  यावर्षी 2 लाख 30 हजार यात्रेकरुंनी नोंदणी केली होती. यंदा 29 जून रोजी सुरु झालेली अमरनाथ यात्रा 40 दिवस चालू राहील. रक्षाबंधनला अमरनाथ यात्रा पूर्ण होईल. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंच अमरनाथ गुफा ही समुद्र सपाटीपासून 3,888 मीटर म्हणजेच सुमारे 12 हजार 756 फूट उंचावर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी एकतर पायीच जावं लागतं किंवा खेचरांचा आधार घ्यावा लागतो. दक्षिण काश्मीरमधील पहलगावपासून हे अंतर सुमारे 46 किमी आहे. म्हणजेच अमरनाथ गुहेपर्यंत तब्बल 46 किमी चालत जावं लागतं. यासाठी पाच दिवस लागू शकतात. या यात्रेसाठी दुसरा रस्ता सोनमर्गच्या बालटालवरुनही आहे. इथून अमरनाथ गुहेचं अंतर केवळ 16 किमी आहे. मात्र उभी चढण असल्याने हा प्रवास अत्यंत कठीण मानला जातो. पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड ही गुहा नेहमीच बर्फाने झाकोळलेली असते.  मात्र थंडी ओसरल्यानंतर हळूहळू बर्फ वितळून गुहेचं तोंड उघडतं. त्याचवेळी भाविक इथे येतात. श्रावण महिन्याच्या आस-पास यात्रा सुरु होते. साधारण 45 दिवसांपर्यंत ही यात्रा असते. ही यात्रा नेमकी कधी सुरु झाली, त्याबाबतची ठोस माहिती उपलब्ध नाही. गेल्या 20 वर्षात या यात्रेचं प्रस्थ वाढलं आहे. त्यामुळे 2000 मध्ये अमरनाथ यात्रा समितीची स्थापना करण्यात आली. ही समितीच या यात्रेचं आयोजन करते. अमरनाथ गुहेची अख्यायिका भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे. या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात. भाविकांना सुविधा अमरनाथ यात्रा समितीकडून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवला जातो. यात्रेदरम्यान दुर्घटना होऊन मृत्यू झाल्यास 1 लाखापर्यंतचा विमा दिला जातो. मात्र यासाठी यात्रा सुरु होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन आवश्यक असतं. हे रजिस्ट्रेशन काही बँकांच्या अधिकृत शाखांमध्येच करता येतं. यात्रेकरुंसाठी शेषनाग, पंचतरणी याठिकाणी सरकार स्टॉल उभारतं. या स्टॉलमध्ये भाविकांना आवश्यक असलेल्या वस्तू ठेवल्या जातात. राशन, लाकूडसामान, तंबू उभारण्यासाठी भाड्याचं साहित्य अशा विविध सुविधा पुरवल्या जातात. संबंधित बातम्या अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हर सलीमला सलाम! …तेव्हा बाळासाहेबांमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती : संजय राऊत  अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यावर वीरुचं संवेदनशील ट्विट  पाकचा इस्माईल अमरनाथ हल्ल्याचा मास्टरमाईंड अमरनाथ हल्ला : पालघरमधील 2, तर गुजरातमधील 5 भाविकांचा मृत्यू 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget