एक्स्प्लोर

Farmers Protest: कृषी कायद्यात बदल करायला तयार, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा: केंद्रीय कृषी मंत्री

नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल व्हावा हा विचार करुन तयार करण्यात आले आहेत, या कायद्यात बदल करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री नरेंद्र सिहं तोमर यांनी केलं.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले 16 दिवस दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, "या कायद्यातील तरतुदींना आक्षेप असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेचा मार्ग अवलंबावा."

ते पुढे म्हणाले की, "मी शेतकरी नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी ही कोंडी फोडावी. सरकारनं चर्चेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यांच्या शंकेचं निराकरण करण्यात येईल. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही होत आहे. त्यात देशात कोरोनाचं संकट आहे. सामान्य जनताही भरडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं."

शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगून कृषी मंत्री म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार आणि शेतकरी नेत्यांत चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या. शेतकऱ्यांना आक्षेप असलेल्या सर्व मुद्द्यावर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पाच तारखेच्या बैठकीत सरकारने त्यांना विचारले की APMC चे सशक्तीकरण करण्यासाठी काय करावं, त्यावर शेतकरी नेते गप्प राहिले."

"सहाव्या फेरीच्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही APMC सशक्तीकरण करण्यासाठी उपाय समोर ठेवले. वीज संशोधन कायद्यावरही पहिल्यासारखीच व्यवस्था आणण्याचा विचार प्रकट केला. शेतकरी नेत्यांनी यावर विचार केला पण अजून कोणताही रिप्लाय दिला नाही. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजले की शेतकरी नेत्यांनी सरकारचा प्रस्ताव नाकारला. त्यांच्याकडूनही अजून कोणताही चर्चेचा प्रस्ताव आला नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत." असे कृषी मंत्री म्हणाले.

कृषी मंत्र्यांनी सांगितलं की, "भारत सरकारनं शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच हे कायदे तयार केले आहेत. शेतकऱ्यांवर अनेक दशके अन्याय होतोय, तो दूर करण्यासाठी सरकारनं हा कायदा केला आहे. तरीही शेतकरी संघटनांशी चर्चा करुन या कायद्यात बदल करण्यास आम्ही तयार आहोत."

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

42 तरुण मुंडावळ्या बांधून बोहल्यावर बसले; वऱ्हाडी लग्नमंडपात वाटच पाहत राहिले, पण नवरीचा पत्ताच नाही; सत्य समजताच साऱ्यांनाच धक्का; देवास हादरलं!
42 तरुण मुंडावळ्या बांधून बोहल्यावर बसले; वऱ्हाडी लग्नमंडपात वाटच पाहत राहिले, पण नवरीचा पत्ताच नाही; सत्य समजताच साऱ्यांनाच धक्का; देवास हादरलं!
Supreme Court on SIR: सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, एसआयआर मोहीम वैध असल्याचा निर्वाळा, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, एसआयआर मोहीम वैध असल्याचा निर्वाळा, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन
Byju Raveendran Case : सिंगापूरमध्ये 'बायजूस'च्या संस्थापकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास; 70,500 डॉलर्स भरण्याचेही आदेश; नेमकं प्रकरण काय?
सिंगापूरमध्ये 'बायजूस'च्या संस्थापकाला 6 महिन्यांचा तुरुंगवास; 70,500 डॉलर्स भरण्याचेही आदेश; नेमकं प्रकरण काय?
Ebola Virus In India : इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन
इबोलाच्या भीतीने सरकारच्या सावध पवित्रा; युगांडावरुन नागपूर एअरपोर्टवर उतरलेल्या 'त्या' व्यक्तीला बाजूला केलं, 21 दिवस होम आयसोलेशन

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला, फेसबुकचा डीपी बदलला, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
Embed widget