एक्स्प्लोर

गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख तातडीने दिल्लीला, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत तासभर खलबतं!

सोमवारी दुपारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या निवासस्थानी वकिलांच्या टीमसोबत त्यांनी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चर्चा केली. त्यामुळे त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास पाच ते सहा वकिलांची फौजही सिंघवी यांच्या 'अनीतायन' या निवासस्थानी हजर होती. हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे. बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता अनिल देशमुख हे तिथून निघाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे.

अनिल देशामुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, "उच्च न्यायालयाकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून पदापासून दूर होत आहे."

 

गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख नागपूरला रवाना होतील असं बोललं जात होतं. मात्र ते थेट दिल्लीला रवाना झाले. सुरुवातीला त्यांच्या या दिल्ली दौऱ्यासंदर्भात अतिशय गुप्तता त्यांच्या कार्यालयकडून बाळगण्यात आली होती. राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख अद्याप मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले नाहीत, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती.

 

नैतिकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नाही म्हणून स्वत:हून राजीनामा दिला : अनिल देशमुख

दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील हे राज्याचे गृहमंत्री झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ, थायलंडमधून मुली आणल्या, मसाजच्या बहाण्याने देहविक्रीचा धंदा, नवी मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई
नेपाळ, थायलंडमधून मुली आणल्या, मसाजच्या बहाण्याने देहविक्रीचा धंदा, नवी मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई
Stray Dog Attack: खाऊची पिशवी घेऊन घरी जाणाऱ्या चिमुकलीवर भटके कुत्रे तुटून पडले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद
खाऊची पिशवी घेऊन घरी जाणाऱ्या चिमुकलीवर भटके कुत्रे तुटून पडले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद
Kolhapur Crime: आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं, कोल्हापूर हादरलं!
आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं, कोल्हापूर हादरलं!
Mumbai Crime : दादरच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, आरोपीकडे मुलींनी बोट दाखवलं अन्...; पाच वर्षांनी न्यायालयाचा मोठा निर्णय
दादरच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, आरोपीकडे मुलींनी बोट दाखवलं अन्...; पाच वर्षांनी न्यायालयाचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळ, थायलंडमधून मुली आणल्या, मसाजच्या बहाण्याने देहविक्रीचा धंदा, नवी मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई
नेपाळ, थायलंडमधून मुली आणल्या, मसाजच्या बहाण्याने देहविक्रीचा धंदा, नवी मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई
Stray Dog Attack: खाऊची पिशवी घेऊन घरी जाणाऱ्या चिमुकलीवर भटके कुत्रे तुटून पडले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद
खाऊची पिशवी घेऊन घरी जाणाऱ्या चिमुकलीवर भटके कुत्रे तुटून पडले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद
Kolhapur Crime: आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं, कोल्हापूर हादरलं!
आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली, मग कोयत्याने गळ्यावर सपासप वार करुन संपवलं, कोल्हापूर हादरलं!
Mumbai Crime : दादरच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, आरोपीकडे मुलींनी बोट दाखवलं अन्...; पाच वर्षांनी न्यायालयाचा मोठा निर्णय
दादरच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलींसोबत नको ते कृत्य, आरोपीकडे मुलींनी बोट दाखवलं अन्...; पाच वर्षांनी न्यायालयाचा मोठा निर्णय
Jyoti Waghmare & Kumar Ashirwad: पूरग्रस्त गावात चमकोगिरी करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला खडेबोल सुनावणारे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण?
पूरग्रस्त गावात चमकोगिरी करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला खडेबोल सुनावणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण?
Dharashiv Flood Farmers: पूरामध्ये घरदार वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीस, धाराशिवमध्ये संताप आणणारा प्रकार
पूरामध्ये घरदार वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना SBI बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीस, धाराशिवमध्ये संताप आणणारा प्रकार
Nitin Gadkari: इथेनॉलच्या आरोपावर नितीन गडकरींचं उत्तर म्हणाले, शक्तिशाली लॉबी माझी बदनामी करतेय; काही उद्योगपती.....
इथेनॉलच्या आरोपावर नितीन गडकरींचं उत्तर म्हणाले, शक्तिशाली लॉबी माझी बदनामी करतेय; काही उद्योगपती.....
Latur News : लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, अफवांनाही उधाण
Embed widget