एक्स्प्लोर

सिब्बल यांच्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांचीही कॉंग्रेस नेतृत्वावर टीका, राहुल गांधींचा 'नया लडका' असा उल्लेख

कॉंग्रेसच्या नेतृत्वावर टीका करत गुलाम नबी आझादांनी सांगितले की कॉंग्रेस पक्ष सध्या सर्वात खालच्या स्तरावर उभा आहे, वरिष्ठ नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला आहे. या आधी कपिल सिब्बल यांनीही पक्ष नेतृत्वावर अशाच प्रकारची टीका केली होती.

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या सुमार कामगिरीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधत त्यांचा 'नया लडका' असा उल्लेख केला आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बिहारमधील पक्षाच्या पराभवावरुन पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "कॉंग्रेसने आपला पाया गमावला आहे." तसेच पक्षाच्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'नया लडका' असा राहुल गांधींचा उल्लेख करुन त्यांनी त्यांच्यावरही टीका केली.

कॉंग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले की, "कॉंग्रेस पक्ष सध्या सर्वात खालच्या स्तरावर उभा आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा कार्यकर्त्यांसोबतचा संपर्क तुटला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलात बैठका घेऊन निवडणुका लढवता येत नाहीत."

या आधी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "2019 सालच्या लोकसभेतील पक्षाच्या कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी न राहण्याचा निर्णय घेतला होता. राहुल गांधींनी असेही म्हटले होते की या पदावर गांधी परिवारातील कोणताही सदस्य असू नये. अशा परिस्थितीत दीड वर्षानंतरही एखादा पक्ष अध्यक्षाविना कसे काय काम करु शकेल?"

या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदावरुन याआधीही पक्षात अनेकदा वाद झाला आहे. कॉंग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून अनेक मुद्द्यावर टीका केली होती. त्या पत्रात असं लिहलं होतं की, "राहुल गांधी यांना आमचा मुळीच विरोध नाही, पण जो कोणी अध्यक्ष असेल तो पूर्णवेळ असावा, त्याने लोकांना भेटावे, कोणताही इश्यू असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल, पक्ष संघटनेला वेळ द्यावा. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेतला तर चांगली गोष्ट, आता हंगामी अध्यक्ष आहे त्याऐवजी पूर्ण वेळ अध्यक्ष असावा, सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली तरी पाठिंबा, राहुल गांधी यांनी स्वीकारली तरी पाठिंबा आहे." या पत्रावरुनही मोठा वाद झाला होता. राहुल गांधींनी त्याला उत्तर देताना सांगितले होते की या नेत्यांनी भाजपशी संधान बांधलंय.

बिहारमध्ये कॉंग्रेसच्या अगदीच सुमार कामगिरीमुळे महागठबंधनला अवघ्या काहीच जागांनी सत्ता गमवावी लागली. या निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. त्याचा पक्षाला काहीच फायदा झाला नाही. कॉंग्रेसला गेल्या वेळच्या जागाही टिकवता आल्या नाहीत. तेव्हापासून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद बाहेर येत आहेत.

पहा व्हिडीओ: Kapil Sibal | लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरल्या नाहीत : कपिल सिब्बल

" "
-

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.