एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे लाखो भारतीयांवर परिणाम झाल्याचं म्हटल.

मुंबई : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे (Petrol) वाहनांचा मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी सातत्याने पाहायला मिळत आहेत. अनेक युट्यूबर्संने याबाबत व्हिडिओ बनवून आपली भूमिका मांडली आहे, तर काही मिम्सही व्हायरल झाले आहेत. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींना मेन्शन करत नेटीझन्स आपला अनुभव सांगत आहेत. मात्र, काहीजण मला जाणीवपूर्वक टार्गेट करत असून माझ्याविरुद्ध पेड कॅम्पेन राबवले जात असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं होतं. आता, ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरेंनीही (aaditya thackeray) इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मायलेज कमी झाल्याचे सांगत थेट पंतप्रधान नरेंद मोदींना (Narendra modi) पत्र लिहिले आहे. तसेच, ग्राहकांना 100 टक्के पेट्रोल आणि इथेनॉलमिश्रित पेट्रोल असा पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे लाखो भारतीयांवर परिणाम झाल्याचं म्हटल. केंद्र सरकारकडून इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर हे पत्र लिहिण्यात आले आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीय वाहनधारकांवर परिणाम झाला असून, त्याचा व्यापक अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, एखाद्या विशिष्ट हितसंबंधी गटाला लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय नागरिकांवर हा निर्णय लादणे, असे या इथेनॉलच्या मुद्द्याचे स्वरूप बनू नये. त्याऐवजी नागरिकांना परवडणाऱ्या दरात पर्याय उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी देखील या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

आदित्य ठाकरे पत्रात म्हणतात, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे वाढते मिश्रण याबाबत देशभरातील लाखो वाहनधारक, विशेषतः युवक आणि मध्यमवर्गीय नागरिक, व्यक्त करत असलेल्या वाढत्या चिंतेकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. देशातील बहुतांश कुटुंबांसाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करणे ही ऐशोआरामाची गोष्ट नसते. अनेक वर्षांच्या कष्टातून, बचतीतून आणि अनेकदा दीर्घकालीन कर्ज (EMI) फेडत हे वाहन घेतले जाते. त्यामुळे वाहन उत्पादकांनी दिलेल्या आश्वासनांनुसार ते वाहन अपेक्षित कामगिरी आणि इंधन कार्यक्षमता (मायलेज) देईल, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. परंतु, इथेनॉलचे प्रमाण वाढल्यापासून अनेक नागरिकांचा दावा आहे की त्यांच्या वाहनांचे मायलेज कमी झाले असून वाहनाची कामगिरीही घसरली आहे. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांची रचना जास्त प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनासाठी मूळतः करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही पर्याय उपलब्ध नसताना या धोरणाचे परिणाम वाहनधारकांवर लादले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.

निर्णयाचा विशिष्ट कंपन्यांनाच फायदा 

इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड वाढवली जात असल्याबाबतही आदित्य यांनी चिंता व्यक्त केली जात आहे. ऊस हे देशातील सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांपैकी एक आहे. भारतातील अनेक भाग गंभीर पाणीटंचाईचा सामना करत असताना, हा मार्ग खरोखरच शाश्वत आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, या धोरणाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपेक्षा काही विशिष्ट कंपन्या आणि औद्योगिक गटांना अधिक होत असल्याची व्यापक धारणा निर्माण झाली आहे. ही धारणा खरी असो वा नसो, या शंकांचे आणि चिंतेचे पारदर्शकपणे निरसन होणे अत्यंत आवश्यक आहे. 

दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत

जगातील अनेक देशांमध्ये ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. ज्या वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्याची क्षमता आहे, ते वाहनधारक ते इंधन वापरू शकतात; तर इतर वाहनधारकांना नियमित पेट्रोल वापरण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे आदित्य यांनी पत्रात म्हटले. देशातील नागरिकांचे ग्राहकहित लक्षात घेऊन अशाच प्रकारचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी 100 % शुद्ध पेट्रोल आणि इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (ज्या ग्राहकांना ते वापरायचे आहे त्यांच्यासाठी) असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात द्यावेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल, सध्या वापरात असलेल्या लाखो वाहनधारकांची गैरसोय टळेल आणि सरकारच्या धोरणांबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल. देशातील कष्टकरी मध्यमवर्ग, युवक आणि लाखो वाहनधारकांच्या हिताचा विचार करून आपण या विनंतीचा सकारात्मक विचार कराल, असेही आदित्य यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा

सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget