एक्स्प्लोर

रविवार ठरला घातवार, दिवसभरात 99 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील दोन घटनांमध्ये बारा जणांचा जीव गेला, तर परदेशात आणि देशभरातही विविध घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला.

मुंबई : रविवारी महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटनांमध्ये 95 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय यामध्ये अफागाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे, ज्यात 20 जणांचा जीव गेला. तर महाराष्ट्रातही अपघात आणि धुळ्यातील जमावाच्या हल्ल्याची घटना घडली दिल्लीत एकाच घरात 11 मृतदेह आढळले राजधानी दिल्लीची सकाळच धक्कादायक घटनेने झाली. बुराडी भागातील एका घरात 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. या मागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून घटनेची चौकशी चालू आहे. मोक्ष प्राप्तीसाठी या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गडचिरोलीत अपघातात सात जणांचा मृत्यू सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता, की चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जिमलगट्टापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोविंदगावाजवळ काल सकाळी 9.30 च्या दरम्यान काळी पिवळी वाहनात घरघुती सामान नेण्यात येत होतं. यावेळी चंद्रपूर पासिंग वाहन सुझुकी बलेनो आणि काळी पिवळी यामध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बलेनोमध्ये असणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जिमलगट्टा प्राथमिक उपकेंद्रात दाखल केल्यानंतर काळी पिवळीमधील वाहन चालक आणि बलेनो वाहनातील दोन लहान बाळंही दगावले. उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 48 जणांचा मृत्यू उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील नैनीडांडा भागात एक बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. गढवाल मोटर युजर्सची ही बस रविवारी पहाटे सहा वाजता धौन गावाहून रामनगरला निघाली होती. सकाळी 8.45 वाजता पिपलीधौन मोटर मार्गावर ग्वीन गावाजवळ ही घटना घडली. या भागात एका गावात जागरण कार्यक्रम होता. तो आटोपून परतणाऱ्या लोकांच्या या गाडीला अपघात झाला. याव्यतिरिक्त सुट्ट्यांमध्ये गावी येऊन पुन्हा दिल्लीला परतणारे लोकही या बसमध्ये होते. दिल्लीसाठी रामनगरहून दुसरी बस पकडण्यासाठी हे लोक निघाले होते. रस्त्यापासून खाली 60 मीटर अंतरावर ही बस कोसळली. धुळ्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलैला दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली. मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथेही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला. मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर आत्मघाती हल्ल्याने हादरलं. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी जलालाबादच्या दौऱ्यावर होते. अधिकाऱ्यांनी या आत्मघाती बॉम्ब स्फोटाची अधिकृत माहिती दिली. हल्ल्याची जबाबदारी अजून कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. बिहारमध्ये दोन घटनेत आठ जणांचा मृत्यू बिहारमध्ये दोन घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला गेलेल्या चार जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर दुसरी घटना बिहारमधीलच सहरसा जिल्ह्यात घडली. ड्रेनेजच्या टाकीत गुदमरुन चार जणांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Embed widget