एक्स्प्लोर

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील भाजपामध्ये असते, नारायण राणेंचा दावा

जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी भाजपच्या नेत्यांशी त्यांची झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते.

रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

रत्नागिरी येथे बोलताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, जयंत पाटील हे या आणि पुढील पाच वर्षे देखील मीच मंत्री असेन असं म्हणाले असतील. कारण, आता जर भाजपचं सरकार असतं तर जयंत पाटील मंत्री असते. तशी तयारी त्यांनी दर्शववी होती. ते आपलं काम करतात बाकी काही बोलत नाहीत. ते माझ्याबद्दल देखील बोलले. पण, मी त्यांचा समाचार इस्लामपूर येथे जाऊन घेणार आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी भाजपच्या नेत्यांशी त्यांची झाली होती. काही गोष्टींकरता ते थांबले होते. नाहीतर ते आज भाजपमध्ये असते.

सरकार वर्षभर पूर्णपणे अपयशी ठरलं

महाविकास आघाडी सरकारवरही नारायण राणेंनी जोरदार हल्ला चढवला. सरकार वर्षभर पूर्णपणे अपयशी ठरलं असून राज्यात बेबंदशाही असल्याची टीका राणे यांनी यावेळी केली. सरकारने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण झालेली नसून शेतकरी कर्जमाफीचं काय झालं असा सवाल राणे यांनी केलाय. हे सरकार निकम्म आहे. सध्या राज्यात दडपशाही असून सुशांतचा खून झाला. पण, सरकार मंत्र्यांना वाचवण्यासाठी ही आत्महत्या असल्याचं दाखवत आहे.

शिवाय, यांचं हिंदुत्व काय ते माहित आहे. गद्दारी करून सरकार स्थापन झालं आहे. कोरोनाच्या काळात देखील भ्रष्टाचार झाला असून उद्या मुंबई मनपामध्ये सत्तेत आल्यानंतर याची चौकशी करणार असल्याचं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलंय. तसेच मराठा आरक्षणाबाबत आम्हाला कोणतीही तडजोड नकोय. कुणामधीलही आरक्षण आम्हाला नकोय. आम्हाला हक्काचं 16 टक्के आरक्षण हवं असल्याचं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dharashiv  Lok Sabha Elections 2024 : प्रवीण परदेशी कमळ चिन्हावर लढण्यास आग्रही : ABP MajhaRavikant Tupkar  Lok Sabha  : शंभर टक्के विजय शेतकऱ्यांच्या मुलांचा होणार : रविकांत तुपकरIncome Tax  Notices Congress Party : काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस : ABP MajhaShiv Sena Lok Sabha Candidates: शिवसेनेच्या पहिल्या यादीतील उमेदवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
हैदराबादचा धावांचा डोंगर,मुंबईचे चाहते रागात, रोहित शर्मा बाद होताच चेन्नईप्रेमीकडून आनंद व्यक्त, पुढं जे घडलं ...
'रोहित शर्मा गेला, आता मुंबई कशी जिंकणार?' चेन्नईप्रेमीच्या सवालानं मुंबईचे चाहते भडकले, पुढं जे घडलं ते....
Archana Puran Singh : फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
फक्त हसण्यामधून अर्चना पूरन सिंहची होते कमाई; एका एपिसोडसाठी किती मिळतं मानधन?
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
RCB Vs KKR LIVE Score Updates, IPL 2024: कोलकाता बंगळुरु आमने सामने, विजयाचा ट्रेंड कोण सुरु ठेवणार?
Thane Lok Sabha Election : ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
ठाण्याचा गड कोण लढणार? शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीसांच्या आग्रहापुढे शिंदे हात टेकणार?
Embed widget