एक्स्प्लोर

अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यावर मध्यस्थीची जबाबदारी

Maharashtra Politics  मुंबईतील मंत्रालयात काल (24 जून) राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मात्र या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं आहे.

Maharashtra Politics  मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी (24 जून) मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मात्र या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक (Shiv Sena Minister Meeting) झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून (Uday Samant) अजित पवारांची भेट घेण्यात आली. तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा, याकरता उदय सामंतांनी पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचे बोललं जात आहे.

तर निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत (Ajit Pawar) शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंतावर टाकण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिष्टाईची महायुतीतील समन्वय राखन्यास कशी मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.   

अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत

दरम्यान, निधीवाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंत यांना देण्यात आली आहे. सोबतच आगामी निवडणूकीत मतदारांसमोर जातांना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.

निधी वाटप करतांना कोणत्या कामासाठी किती निधी दिला जावा, यात शिवसेनेत पक्षीय पातळीवरही समन्वय राखला जावा, निधीवाटपात सूसुत्रता यावी याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करतांना दिसत आहेत. शिवाय उदय सामंत यांचे शिवसेनेत मंत्री म्हणून वजन आहेच. सोबतच राष्ट्रवादीतही जून्या सहकाऱ्यांसोबत ते चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे उदय सामंत हे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरही समन्वयकाचीच भूमीका पार पाडत आहेत. असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उदय सामंत यांच्याकरवी निधीवाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Pune Accident News: चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं; बस थेट मेट्रोच्या पिलरला धडकली, मागून आलेल्या ट्रकचीही धडक, शिवाजीनगर परिसरात मोठी वाहतूक कोंडी
Embed widget