एक्स्प्लोर

Samruddhi Highway Accident : 'समृद्धी'चा नव्हे मृत्यूचा महामार्ग; दहा महिन्यांत 123 बळी, दरमहा 128 अपघात

Samruddhi Highway Accident : मागील 10 महिन्यांत या महामार्गावर सर्व मिळून 1281 अपघात झाले असून, त्यात 123 जणांचा बळी गेला आहे.

Samruddhi Highway Accident : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिकांची चर्चा होऊ लागला. तर, हा 'समृद्धी'चा नव्हे मृत्यूचा महामार्ग बनला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. कारण मागील 10 महिन्यांत या महामार्गावर सर्व मिळून 1281 अपघात झाले असून, त्यात 123 जणांचा बळी गेला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धीचे मोठ्या गाजावाजा करत लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील मोठे योगदान आहे. तर, 11 डिसेंबर 2022  रोजी पहिल्या आणि 26 मे 2023 दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण करण्यात आले. मात्र, समृद्धी सर्वसामन्यांसाठी सुरु करताच एकमागून एक अपघातांची मालिका पाहायला मिळाली. अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची 150 ही मर्यादा 120  वर आणली गेली. मात्र, समृद्धीच्या दृष्टीने उभारण्यात आलेली यंत्रणा अजूनही अपघात रोखण्यासाठी यशस्वी ठरलेली नसल्याचे चित्र आहे. समृद्धी महामार्गावर मदतीसाठी पूर्ण टोलनिहाय यंत्रणा उभारल्याचा दावा करण्यात येत असला तरीही अपघातांच्या मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर कोणतेही तपासणी होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तर, ज्यांच्यावर तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे, ते वसुलीत व्यस्थ असल्याचा आरोप होत आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघात...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर देखील सतत छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडतच असल्याचे समोर आले आहे. आजवर जिल्ह्यात 14 लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली असून, त्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथिमक माहिती आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर 120 कि.मी. पर्यंत आहे.

दहा महिन्यांत महामार्गावर झालेले अपघात

  • नागपूर ते मुंबईपर्यंत एकूण 1281 अपघात झाले आहेत.
  • यात एकूण 932 किरकोळ अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
  • यात एकूण 417 मोठे अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
  • मागील दहा महिन्यात 123 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. 

आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई...

छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाहून नाशिकला परत जात असताना या भाविकांवर काळानं घाला घातला. धक्कादायक म्हणजे अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने थांबवल्यानेच मागून आलेली टेम्पो बस येऊन धडकल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे आरटीओने ट्रकला थांबवल्याचा व्हिडीओ देखील समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणी हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.  प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Video: समृद्धी महामार्गावरील 12 जणांच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार, ट्रकला RTO महामार्गावर थांबवल्याचा व्हिडीओ समोर; दोन्ही अधिकारी अटकेत

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Embed widget