एक्स्प्लोर

SSC HSC Exam Result: शिक्षकांचा संप मागे, उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाला गती; दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागणार

SSC HSC Exam Result: दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

SSC HSC Exam Result: जुन्या पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचारी संपावर (Strike) गेले होते. याच संपात शिक्षकांचा (Teacher) देखील सहभाग पाहायला मिळाला. त्यामुळे या संपाचा परिणाम दहावी, बारावीच्या परीक्षेच्या निकालावर (SSC HSC Exam Result) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर विभागात दहावी, बारावीच्या जवळपास दहा लाख उत्तरपत्रिका मूल्यांकनाविना पडून होत्या. तसेच शंभरपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी न करता शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली होती. परंतु, सोमवारी (20 मार्च) रोजी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने उत्तरपत्रिका तपासण्यास शिक्षकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल वेळेत लागणार असल्याचा दावा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शिक्षकांनी दहावी-बारावीचे पेपर तपासणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांनी पेपरचे गठ्ठे मंडळाकडे परत पाठवले होते. छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 15 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. मात्र, संप मागे घेतल्यामुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. तर बारावीची परीक्षा संपली असून, शनिवारी (25 मार्च) रोजी दहावी बोर्डाची परीक्षा संपणार आहे. त्यामुळे सध्या बोर्डाकडून उत्तरपत्रिकांचे संकलन सुरु आहे. तसेच शिक्षकांनी वेळेत उत्तरपत्रिका तपासून देण्याचे आश्वासन बोर्डाला दिले आहे. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल नियोजित वेळेत लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न असल्याचे विभागीय मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

विद्यार्थ्यांनी काहीसा दिलासा

वर्षभर कष्ट करून मुलं दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करतात. त्यामुळे परीक्षा झाल्यावर निकाल कधी लागणार याकडे त्यांचं लक्ष लागलेले असतं. मात्र शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल 15 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून होत्या. अनेक शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासता गठ्ठे परत पाठवले होते. त्यामुळे यावेळी दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली होती. विशेष म्हणजे, याचे परिणाम पुढील प्रवेश घेताना देखील होण्याची शक्यता होती. परंतु शिक्षकांचा संप मिटला असल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास  सोडला आहे. 

बारावीच्या परीक्षेत 102 कॉपीचे प्रकार 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागातून एकूण 1 लाख 68  हजार 263 विद्यार्थ्यांनी 430 केंद्रांवरून परीक्षा दिली. दरम्यान या काळात परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु असे असताना देखील विभागात 102 गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. ज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 29, बीड 01, जालना 40, हिंगोली 32 असे एकूण 102 गैरप्रकार समोर आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Unseasonal Rain : विभागीय आयुक्तांचे निर्देश अन् जिल्हाधिकारी पोहचले बांधावर; नुकसानीची केली पाहणी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget