![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल
Aurangabad : हे प्रकरण एटीएसकडे (दहशतवादविरोधी पथकाने) तपासासाठी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
![औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल Aurangabad women left for Saudi Arabia Investigation started by the police औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/03c07c23bfa02683c09d65ad695e917f1693280364157737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात आलेली 'सीमा हैदर' (Seema Haider) प्रकरण चांगलंच गाजत आहे. सोबतच प्रेमासाठी देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली 'अंजू'चं देखील प्रकरण समोर आले आहे. त्यात आता औरंगाबादच्या (Aurangabad) आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. सोशल मीडियावर विदेशी तरुणाच्या प्रेमात पडलेली औरंगाबाद शहरातील एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विदेशात गेल्यावर ती देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा एक मेल औरंगाबाद पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता या महिलेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. सोबतच हे प्रकरण एटीएसकडे (दहशतवादविरोधी पथकाने) तपासासाठी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
औरंगाबाद शहरातील एका विवाहित महिलेची सोशल मीडियावर विदेशी तरुणासोबत ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे डिसेंबर महिन्यात ही महिला प्रियकराच्या मदतीने सौदीला पळून गेली. या प्रकरणी तिच्या पतीने पोलीस ठाण्यात नोंद केली. या काळात काही महिने ती सौदी अरेबिया व इतर देशांमध्ये राहिली. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती पुन्हा भारतात परतली. पण औरंगाबादला पतीच्या घरी न जाता नाशिक जिल्ह्यातील माहेरी गेली. सध्या ती तेथेच राहत आहे. असे असतानाच औरंगाबाद पोलिसांना या महिलेबाबत 28 ऑगस्टला एक ई मेल प्राप्त झाला आहे. विदेशात गेल्यावर ही महिला देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस खडबडून जागी झाले आहेत. तर आता या सर्व प्रकरणाचा तपास एटीएसकडून सुरु असल्याचे कळत आहे.
पोलिसांकडून गंभीर दखल...
सौदीत पळून गेल्यावर ही महिला देशविघातक कृत्य करत होती, असा आरोप मेलमध्ये करण्यात आला आहे. याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी लगेचच हे प्रकरण दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविले. तर एटीएसने कसून तपास सुरु केला आहे. हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्याचा उद्देश काय? ती महिला प्रियकराला सोडून परत का आली?, ती खरेच प्रियकराकडे गेली होती का? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्याचा तपास करत आहे.
महिलेची कसून चौकशी...
डिसेंबर महिन्यात औरंगाबादची ही महिला थेट प्रियकराच्या मदतीने सौदीला निघून गेली. काही दिवस तिथे राहिली. याच काळात ती आणखी काही देशात फिरल्याचा संशय आहे. मात्र, ती पुन्हा देशात परत आल्याने आणि पोलिसांना ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये परत आलेल्या या महिलेची पोलिसांसह एटीएसकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात आणखी काय-काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)