एक्स्प्लोर

Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चंद्रपूर : देशभरात आज (26 फेब्रुवारी) साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री (MahaShivratri 2025) निमित्य सर्व शिवमंदिर आणि तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. तर राज्यभरात अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असताना चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील व्याहाड येथील ही घटना असून आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

काळाचा घाला, 3 सख्या बहिणींचा बुडून वैनगंगा नदीत मृत्यू

पुढे आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते, मात्र हरणघाट मार्ग खराब असल्याने मार्कंडासाठी गडचिरोलीमार्गे जात असताना व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा त्यांनी बेत आखला. अशातच चंद्रपूर-गडचिरोली सिमेवरील एका झाडाखाली गाडी ठेवून सर्व जण नदी पात्रात उतरले. मात्र आंघोळ करीत असतानाच एक लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे दिसताच इतर सर्वांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात काका-काकू आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला. तर 3 बहिणींचा मात्र या पाण्याचा प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात मृत्यू झालाय. प्रतिमा प्रकाश मंडल (वय 23 वर्ष), कविता प्रकाश मंडल (वय 21 वर्ष) आणि लिपिका प्रकाश मंडल (वय 18 वर्ष) अशी मृतकांची नावं असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास सावली पोलीस आणि आपदा प्रबंधन विभाग करत असून मृतदेहांचा शोध सध्या घेतला जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू 

यातील दुसरी अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे घडली आहे. यात 3 युवकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वर्धा नदीच्या चुनाळा घाटावरील आज(26 फेब्रुवारी) दुपारची ही घटना असून राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या वर्धा नदीपात्रात ही घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोकं नदी घाटावर अंघोळीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मात्र बुडालेले तिन्ही तरुण नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल असलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.  तुषार शालिक आत्राम (वय 17 वर्ष), मंगेश बंडू चणकापुरे (वय 20 वर्ष) आणि अनिकेत शंकर कोडापे (वय 18वर्ष) अशी मृतकांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच  राजुरा आणि बल्लारपूर पोलीस यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget