एक्स्प्लोर

Kshirsagar Family: बीडच्या राजकारणातील क्षीरसागर कुटुंब! एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा..

Beed News : बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाची नेहमीच चर्चा होत असते.

Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील राजकारण नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे. आधी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) विरुद्ध धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आता जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यामुळे बीडचे राजकारण गाजले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका-पुतण्याचे वाद संपले. मात्र, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे. त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तर पाहू यात क्षीरसागर कुटुंबातील राजकीय इतिहास आहे तरी कसा...

क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय इतिहासाची सुरवात सोनाजीराव क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी खासदार केशर काकू यांच्यापासून होते. मूळच्या कर्नाटकमधील माहेर असलेल्या केशर काकू यांचे  सोनाजीराव क्षीरसागर यांच्यासोबत विवाह झाला. तसं सोनाजीराव क्षीरसागर याचं त्यावेळी गावात आणि परिसरात दबदबा होता. पण ज्या काळात महिलांना घरा बाहेर पडण्याची परवानगी मिळत नव्हती त्यावेळी सोनाजीराव यांनी केशर काकूंना राजकारणात पुढे आणलं. पुढे त्या पंचायत समितीसभापती, खासदार झाल्या. तेव्हापासून सुरु झालेला क्षीरसागर कुटुंबाचा राजकीय वारसा अजूनही सुरूच आहे.

एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा...

मागील काही दिवसांत जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वाद चर्चेचा विषय बनला आहे. काका-पुतण्याचा वाद निवडणुकीत अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. त्यातच आता जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवारांच्या गटात सहभागी होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे क्षीरसागर कुटुंबातील राजकीय वाद कितीही टोकाचे असले तरीही हे कुटुंब एकाच घरात राहतात. बीड शहरातील नगर रोडवर क्षीरसागर कुटुंबाचा बंगला आहे. याच बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंबं राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा असला तरीही घर मात्र एकच आहे. 

क्षीरसागर कुटुंबाची वंशावळ 

सोनाजीराव क्षीरसागर आणि केशर काकू क्षीरसागर यांना एकूण चार मुलं होती. ज्यात जयदत्त क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. विठ्ठल क्षीरसागर समावेश आहे. तर या चार भावांपैकी डॉ. विठ्ठल क्षीरसागर राजकारणापासून लांब राहिले. तर, जयदत्त क्षीरसागर यांना दोन मुलं असून, ज्यांची नावं रोहित क्षीरसागर आणि हर्षद क्षीरसागर आहे. रविंद्र क्षीरसागर यांना तीन मुलं आहेत. ज्यांची नावं संदीप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर असे आहेत. तर,  डॉ. भारतभूषण यांना एकच मुलगा असून, ज्याचं नाव योगेश क्षीरसागर आहे. 

राजकीय कारकिर्द

  • जयदत्त क्षीरसागर : बीड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, चार वेळा आमदार तथा राज्यमंत्री.
  • रवींद्र क्षीरसागर : गजानन साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य.
  • डॉ. भारतभूषण क्षीरसागर : बीड नगर परिषदेमध्ये 35 वर्ष नगराध्यक्ष.
  • संदीप क्षीरसागर : पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, बीड विधानसभा मतदारसंघ आमदार.
  • डॉ. योगेश क्षीरसागर : बीड नगरपरिषद सदस्य.
  • हेमंत क्षीरसागर : नगरपरिषद सदस्य, नगरपरिषद उपाध्यक्ष.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed Politics: जयदत्त क्षीरसागर यांचा दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane on Vilas Ghule Case: विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
विलास घुले प्रकरणात मुलाचं नाव, बजरंग सोनवणेंचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले, 'ब्लॅकमेलिंग चालू आहे पण आता मी...'
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget