एक्स्प्लोर

Beed Maratha Protest : बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण? जयदत्त क्षीरसागर यांचा सवाल

Maratha Reservation : बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंखे आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेमागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप करण्यात येतोय. 

बीड: मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation Protest) दरम्यान झालेल्या बीडमधील (Beed) जाळपोळी आणि दगडफेकीमध्ये आमदारांच्या घरावर लक्ष करण्यात आलं, मात्र यामागे एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण हे तपासा अशी मागणी ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी केली आहे. बीडच्या जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत 120 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे या तपासामध्ये पाच अल्पवयीन मुलांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागलेत. हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. 120 तरुणांमध्ये बहुतांश तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत.

आपल्यावर हल्ला करण्याचा उद्देश, प्रकाश सोळंखेंचा आरोप

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली. यामध्ये इतर समाजाचे लोक देखील असल्याचं त्यांनी सांगितलं असून यामध्ये अवैध धंदे आणि राजकीय विरोधक कट रचून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला असल्याचं प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला आहे. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले होते.

जमावाचा उद्देश जीवाताला धोका पोहोचवण्याचा, जयदत्त क्षीरसागरांचा आरोप

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि यावर जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याचे सांगत ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता असा देखील प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला. 

माजलगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीड चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर या दोन आमदाराच्या घरावर जाळपोळ केल्यानंतर आता यामागे राजकीय विरोधक असल्याचा गंभीर आरोप या नेत्यांनी केला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अथवा नेते यात सहभागी असल्याचे पाहायला मिळत नाही. मग पोलीस या जाळपोळीच्या घटनांच्या मुळाशी कधी जाणार हाच खरा सवाल आहे.

ही बातमी वाचा: 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
Abhishek Sharma News : आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
California Mass Shooting: बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
Ditwah Cyclone: तामिळनाडू, पुद्दुचेरीला आज 'दितवाहा' चक्रीवादळ धडकणार; 54 विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद, श्रीलंकेत 150 जणांचा जीव घेतला,  300 भारतीय श्रीलंकेत अडकले
तामिळनाडू, पुद्दुचेरीला आज 'दितवाहा' चक्रीवादळ धडकणार; 54 विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद, श्रीलंकेत 150 जणांचा जीव घेतला, 300 भारतीय श्रीलंकेत अडकले
Embed widget