एक्स्प्लोर

Maharashtra Governor : 'माझ्यावर भाजपचा दबाव असल्याचं कोश्यारी म्हणाले होते'; चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट

Chandrakant Khaire: माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खुप दबाव असल्याचं राज्यपालांनी माझ्याकडे कबूल केले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे. 

Chandrakant Khaire On Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून, याचे राजकीय पडसाद उमटत आहे. तर यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खुप दबाव असल्याचं राज्यपालांनी माझ्याकडे कबूल केले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, भाजपने हा निर्णय घेण्यासाठी खूप उशीर केला आहे. राज्यपाल यांनी अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केली. एकदा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांना विचारले होते की, 12 आमदारांच्या नियुक्तीचं काय झाले. तर त्यांनी सांगितले की, माझ्यावर भाजपचा खूप दबाव आहे. त्यांनी माझ्याकडे तशी कबुली दिली होती. त्यांच्यावर भाजप आणि वरिष्ठांकडून दबाव होता. त्यामुळे त्यांना असे वागावे लागत आहे. त्यांनी स्पष्टपणे मला सांगितले असल्याचे खैरे यांनी सांगितले. मला येथून पळून जावे असं वाटत असल्याचे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते, असा दावा खैरे यांनी केला आहे. 

राज्यपाल यांनी आधीच जायला पाहिजे होते

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर बसणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे. लोकांनी त्यांचा निषेध केला, त्यांना जोडे मारले. त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे जाळले. हे फक्त त्यांच्या स्वभावामुळे झाले आहे. त्यांनी आमच्या औरंगाबाद शहरात येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यांनी आधीच जायला पाहिजे होते, असेही खैरे म्हणाले. 

भगतसिंह कोश्यारी अन् चर्चा...

  • मराठीतून शपथ घेणारे राज्यपाल म्हणून वेगळेपण दाखवले.  त्यांनी मराठीतून अभिभाषण केले होते. राज्यपालपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर थोड्याच दिवसात राज्यात निवडणुका झाल्या.  त्यानंतर सत्तास्थापनेचं मोठं नाट्यही घडलं. कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला. त्यानंतर कोरोनाची साथ आल्यानंतरही भाजपचे नेते वारंवार राज्यपालांकडे जाऊन भेटी घेत होते. त्यामुळं सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
  • उद्धव ठाकरेंची आमदार म्हणून नेमणूक करायला कोश्यारींनी विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अखेर पंतप्रधान मोदींनी सांगितल्यानंतर राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचा आमदार व्हायचा मार्ग मोकळा केला.
  • विद्यापीठाच्या परीक्षांच्या मुद्द्यावरुनही राज्य सरकारच्या विरोधात कोश्यारींनी भूमिका घेतली.  त्यावेळी संघर्ष टाळून राज्य सरकारने कुलपती असलेल्या राज्यपालांचं म्हणणं मान्य केलं.  त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोश्यारींना केलेल्या नमस्काराचा फोटो राजभवनने जारी केला आणि त्यावर सोशल मीडियात एकच चर्चा सुरू झाली.
  • गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केले होते.
  • समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. 
  • महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त वक्तव्य
  • नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत असे वक्तव्य त्यांनी केलं होतं.
  • छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातले आदर्श आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
  • आघाडी काळातील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मंजुर न केल्याने राज्यापालांविषयी संताप
    राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षीय राजकारण करणं अपेक्षित नसतं. पण ते भाजपला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला.

इतर महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : महाराष्ट्राची सुटका झाली, कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी :  शरद पवार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget