एक्स्प्लोर

Aurangabad News: अखेर ठरलं! जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग होणार, मात्र त्यासाठी...

Aurangabad News: जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1798 दलघमी असून तो 1953 दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, 90 टक्के साठा झाल्या नंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.

Aurangabad News: अखेर जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचं ठरले असून, धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याचे निर्णय झाला आहे. पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1798 दलघमी असून तो 1953 दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, 90 टक्के साठा झाल्यानंतरचं पाणी सोडण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

यावेळी पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चीत करण्यासाठी ‘बल्यूलाईन मार्किंग’ करण्याचे निर्देश देवून सदरील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.  तसेच पुढील काही दिवसात धरणात येणारा पाणीसाठा लक्षात घेता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणाची आत्ताची परिस्थिती...

आज सकाळी सहा वाजेच्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा 82.86 टक्के झाला आहे. तर धरणात अजूनही 27 हजार 387 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1798.762 दलघमी आहे. तसेच धरणातील पाणीसाठा फुटमध्ये 1518.70 फुट असून, मीटरमध्ये 462.900 मीटर आहे. 

असा सुरु आहे विसर्ग...

मराठवाड्यातील इतर धरणाची पाणीपातळी लक्षात घेता, जायकवाडी धरणावरील जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला जात आहे. सोबतच उजव्या कालव्यातून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हे पाणी बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात दाखल होत आहे. माजलगाव धरणात अजूनही पाण्याचा साठा हवा तेवढा नसल्याने जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उजव्या कालव्यावर अवलबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घटना

Aurangabad: औरंगाबादची वाटचाल 'क्राईम कॅपिटल'कडे; शहरात सहा महिन्यांत तब्बल 25 खून

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget