एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम?
बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुम्हाला किती पैसे मिळतात?
RBI Rules : बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुमची ठेव सुरक्षीत राहते का? बँक बंद पडल्यावर तुमचे पैसे (Money) परत मिळतात का? तुम्ही एकावेळी बँकेत किती पैसे ठेऊ शकता? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
बँकांमध्ये किती रक्कम ठेऊ शकता?
आरबीआयच्या नियमांनुसार (RBI Rules), तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बँकेत जमा करु शकता. पण बँक बुडली किंवा बंदी घातली, तर तुम्हाला नियमानुसार पैसे परत मिळतात. समजा एखाद्या बँकेत चोरी किंवा दरोडा पडला असेल किंवा बँकेवर बंदी असेल तर बँक तुमच्या संपूर्ण पैशावर कोणतीही हमी देत नाही.
बँक किती पैसे परत करेल?
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ॲक्ट 1961 च्या कलम 16 (1) अन्वये, बँकेत कोणत्याही प्रकारे जमा केलेल्या तुमच्या पैशाची केवळ 5 लाख रुपयांपर्यंतची हमी आहे. जर तुम्ही तुमच्या खात्यात 10 लाख रुपये जमा केले असतील, तर बँक कोलमडल्यास तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. जर तुम्ही यापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर बँकेचे नुकसान झाल्यास तुमचे पैसेही बुडतील. रिझर्व्ह बँकेचे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन तुमच्या जमा केलेल्या पैशाची हमी देते, परंतु हे लक्षात ठेवा की ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. तुमच्याकडे यापेक्षा जास्त पैसे असल्यास, बँक तुम्हाला पूर्ण रक्कम परत करणार नाही.
काय सांगतो RBI नियम?
फक्त एक बँक तुमच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमी देते. वेगवेगळ्या खात्यांमध्ये कितीही पैसे जमा केले तरी त्यावर फक्त 5 लाख रुपयांची हमी असेल. तुम्ही हे पैसे बचत खात्यात किंवा चालू खात्यात ठेवा किंवा तुम्ही एफडी केली असली तरीही. एकूणच, बँकेचे नुकसान झाल्यास, तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी घातली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर बँकेचा नवा व्यवसाय तर ठप्प झाला आहेच. पण ग्राहकांनाही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना पैसे काढता येत नसल्यामुळे संकट निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:























